निवडणुकीचे फूटेज 45 दिवसांत नष्ट करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे.निवडणूक आयोग आणि मोदी सरकार मिळून लोकशाही व्यवस्थाच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीचा पुरावाच मिटवून टाकण्यात येत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मुख्यमंत्रीफडणवीस यांनी घेतले ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शनआषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप,भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार,चैतन्य लोंढे,पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.