बिहार: बिहारमधील नवादा (Bihar Crime News) जिल्ह्यात, एका महिलेने तिच्या तीन मुलांना सोडून तिच्या प्रियकरासोबत पळ काढला. महिलेने घरात ठेवलेले लाखो रूपयांचे जमिनीचे कागदपत्र आणि दागिनेही पळवून नेले. तिच्या पतीने मुफस्सिल पोलिस ठाण्यात या बाबतची तक्रार दाखल केली आहे. अर्ज मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि एफआयआर नोंदवला.(Bihar Crime News)
हे प्रकरण समय गावातील आहे. गोविंद कुमार यांचे 12 जुलै 2016 रोजी सपना कुमारीशी लग्न झाले होते. या जोडप्याला तीन मुले आहेत, 8 वर्षांची शिवानी कुमारी, 6 वर्षांची सौम्या कुमारी आणि 2 वर्षांचा अमन कुमार… घरमालकाने गोविंदला फोन करून सांगितले की, ‘त्याची पत्नी रोज एका तरुणाला भेटते. तो तरुण रात्री येतो आणि सकाळपर्यंत घरात राहतो.’ यावर गोविंदने त्याच्या पत्नीला समजावून सांगितले. पण, जेव्हा तो चेन्नईहून नवादा येथे परतला तेव्हा त्याची पत्नी घरातून गायब होती.
चेन्नईहून घरी आल्यानंतर त्याने घरात सामानाची शोधाशोध केली. गोविंदला घरी एक फोटो सापडला ज्यामध्ये त्याची पत्नी एका तरुणासोबत दिसली. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी पंकज कुमार नावाच्या एका डॉक्टरवर प्रेम करते आणि त्याच्यासोबत ती पळून गेली आहे. महिलेने तिच्यासोबत कोट्यवधी रुपयांचे जमिनीचे कागदपत्रे, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही नेल्या आहेत.
दरम्यान, जेव्हा एका वृत्तसंस्थेने या संदर्भात फोटोतील डॉक्टर पंकज कुमार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की, हा फोटो चुकीचा आहे. चुकीच्या गोष्टी सांगून मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसएचओ मृत्युंजय कुमार म्हणाले की, अर्ज मिळाल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
आणखी वाचा