Train Accident: तब्बल ७२ हजार लोकांनी जीव गमावला, ३१ टक्के मृतदेह बेवारस अन्...; लोकल अपघाताची धक्कादायक आकडेवारी समोर
esakal June 24, 2025 02:45 AM

मुंबई : नुकतेच मुंबईतील दिवा-मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून यानंतर रेल्वे प्रशासनाने अपघाताला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या होत्या.

मात्र अजुनही रेल्वे अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशातच गेल्या २२ वर्षात विविध कारणांमुळे तब्बल ७२,००० हून अधिक लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून त्यातील हजारो बळींची ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ ते २०२४ दरम्यान, विविध कारणांमुळे ७२,००० हून अधिक लोकांनी रेल्वे रुळांवर आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी बहुतेकांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. यादरम्यान, रेल्वे अपघातात जीव गमावल्यानंतर ओळख पटू न शकलेल्या लोकांची संख्या एकूण मृतांपैकी ३१ टक्के म्हणजेच १४ हजार ५१३ आहे.

२००२ ते २०२४ दरम्यान रेल्वे अपघातातील मृत्यूची कारणे

रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे - ४३ हजार ४२८

ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात पडणे - ३०३

धावत्या ट्रेनमधून पडणे - १४ हजार ३९६

रेल्वे खांबाला धडकणे - ४५६

इतर कारणे - १३ हजार ९४१

३१ टक्के मृतदेह बेवारस

रेल्वे अपघातात जीव गमावलेले ३१ टक्के असे मृतदेह आहेत जे त्यांच्या नातेवाईकांना सापडत नसल्याने बेवारस राहिले आहेत. हे मृतदेह पंधरा दिवस शवागारात ठेवले जातात. त्यानंतर पोलीस स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्याचे अंत्यसंस्कार करतात.

Pune Traffic: अस्ताव्यस्त पार्किंग अन् ट्रॅफिक सिग्नलची कमी; बारामतीत प्रचंड वाहतूक कोंडी, नागरिकांची दमछाक ओळख न पटण्याचे कारण काय?

गेल्या १५ वर्षांत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील एकूण रेल्वे अपघातांपैकी ३१ टक्के म्हणजे १४,५१३ जणांची ओळख पटलेली नाही. हे मृतदेह विद्रुप अवस्थेत असतात. तसेच मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे, प्रशासनाला त्यांची ओळख पेटवण्याचे काम कठीण होते.

दरम्यान, जेव्हा पीडितेची ओळख पटत नाही, तेव्हा मृतदेह १५ दिवस ते एक महिना शवगृहात ठेवला जातो. तसेच कुटुंबाने हरवल्याची तक्रार नोंदवली आहे का हे शोधण्यासाठी पीडितेचा फोटो महानगर प्रदेशातील पोलिस ठाण्यांमध्ये पाठवला जातो. शोध न लागल्यास पंधरा दिवसात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारानंतर कुटुंबाचा शोध लागल्यास, त्याच्या फोटोसह कपडे किंवा पीडितेच्या वैयक्तिक वस्तू पोलीस रेकॉर्डमध्ये लिहून ठेवल्या जातात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.