सेना-मनसे युती होण्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी शुल्लक आहेत. सर्व शिवसैनिकांना आवाहन आपण संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. मराठी माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जबाबदारीचे भान ठेवून व्यक्त शिवसैनिकांनी व्यक्त व्हावे. आदेशावरुन, असे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Nitesh Rane : वारीवर बोलण्याची हिंमत कोणी करू नये? आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थितीत केला तर?आमची वारी वर्षभर असत नाही पण तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला, त्यावर अबू आझमीने आपलं थोबाड उघडावं, अशा शब्दात नितेश राणेंनी अबू आझमीच्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. तसेच, हे आम्ही इथे खपवून घेणार नाही, आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये, आमची वारी अशीच सुरु राहणार असेही ते म्हणाले.
एमआयएमचे माजी खासदार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय-अत्याचार कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. इम्तियाज जलील हे जातीवाद करत असून आंबेडकरी जनतेचा वारंवार अपमान करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांना अटक करून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे.