इराण इस्रायल यांच्यातलं १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध अखेर थांबलं आहे. मात्र दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं आहे. परदेशातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, नोकरीसाठी आलेले नागरिक अडकून पडले आहे. त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे. भारताकडून भारतीय नागरिकांसाठी ऑपरेशन सिंधू राबवलं जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे दोन विद्यार्थी अजूनही तिथंच थांबले आहेत.
मुस्लिम धर्माचं शिक्षण घेण्यासाठी ते गेले आहेत. भारतात येण्यास त्यांनी नकार दिलाय. तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांमध्ये तणावाचं वातावरण आहे. इराणमध्ये अडकलेल्या भोपाळच्या निशातपुरा परिसरातील अबरार अलीने भारतात परतण्यास नकार दिलाय. त्याने म्हटलं की, चार वर्षांपासून इराणमध्ये राहतोय. आता वाईट वेळ आली म्हणून इराण सोडून जाऊ शकत नाही.
Iran Israel Ceasefire : अखेर युद्ध थांबलं! शेवटचा हल्ला इराणने केला, सरकारी टीव्हीवरून शस्त्रसंधीची घोषणाएएनआयशी बोलताना अबरारच्या आईने म्हटलं की, माझा मुलगा अबरार इराणमध्ये अडकलाय. तो चार वर्षांपासून तिथं शिकतोय. आम्ही त्याला परत ये म्हटलं पण तो म्हणाला की आता परत नाही येणार, युद्धाच्या स्थितीत परत आलो तर इराणमधील लोक काय म्हणतील.
अबरारने त्याच्या आईला सांगितलं की, मी तिथलं मीठ खाल्लंय. असा जाणार नाही. इराणमधून सध्या तरी परत येऊ शकत नाही. अबरारच्या आईला मात्र त्याची काळजी आहे. आता तो तिथं सुरक्षित रहावा यासाठी प्रार्थना करतेय. अबरारने आईला सांगितलंय की त्याच्या घरापासून दूर स्फोट होतात आणि मी सुरक्षित आहे.
Iran Israel War : ट्रम्प यांची युद्ध थांबल्याची घोषणा पोकळ, शस्त्रसंधी झालीच नाही; इराणने स्पष्टच सांगितलंअबरारच्या कुटुंबातील सदस्य आबिद अली यांनी सांगितलं की, अबरार मौलाना मौरवियतशी सबंधित कोर्स करण्यासाठी इराणला गेलाय. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला मौलाना उपाधी मिळेल. चार वर्षे झाली आहेत, एक वर्ष बाकी आहे.
अबरारने पंतप्रधान मोदींनासुद्धा आवाहन केलंय. मी भारत सरकारला विनंती करतो की पंतप्रधान मोदींची जगभरात किर्ती आहे. जर त्यांनी पाऊल उचललं तर युद्ध थांबवू शकतात. मोदींनी काहीही करून युद्ध थांबवावं.