शहापूर, ता. २४ (वार्ताहर): राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भिवंडी, शहापूर पंचायत समितीची प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधीची घोषणा केली आहे. विविध कार्यक्रमानिमित्त गोरे सध्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आढावा गोरे यांनी घेतला. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर पंचायत समितीला प्रशस्त जागा असूनही नवीन इमारत नाही. त्यामुळे नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. या मागणीनुसार गोरे यांनी नवीन इमारतीसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. याचबरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणारी तीन धरणे शहापूर तालुक्यात आहेत. त्या पाणीपुरवठ्यापोटी मुंबई महापालिका राज्य शासनाला पाणीकर देते, परंतु सध्या पाणीकर दिला जात नसल्याचे सांगितले.