मंगळवेढा - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच मंगळवेढ्यात मटण व मासे विकत्यांच्या स्थलांतरावरून भाजप व काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला अशा परिस्थितीत राजकीय स्टंटबाजी पेक्षा जनतेचे प्रश्नाकडे लक्ष द्या असा सूर देखील निघू लागला.
मंगळवेढा विविध संतांची भूमी म्हणून राज्यभर परिचित आहे या संतांच्या भूमीत देखील मांस व मासे विक्रेते अनेक वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. मात्र या व्यवसायाविरुद्ध यापूर्वी कधीच तक्रारी उद्भवल्या नव्हत्या नगरपालिकेवर चार वर्षापासून प्रशासक आहेत. अशा परिस्थितीत मांस व मासे विक्रेत्यांच्या स्थलांतराबाबत नगरपालिकेच्या वतीने गट क्रमांक 272 हा आरक्षित ठेवला.
मात्र त्या राखीव जागेत हा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याकडे नगरपालिकेने मात्र सोयीस्कर त्या दुर्लक्ष केले आहे. परंतु शहरात या विक्रेत्यामुळे कुत्र्यांचा वावर आणि मुळे दुर्गंधी व मुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.
मात्र याच तक्रारनंतर काँग्रेसच्या वतीने देखील सदर विक्रेत्याकडून मंदिर परिसरात कुठेही मांस व मासे विक्री केली जात नसल्याचे सांगत भाजपकडून केलेली मागणी ही असंवैधानिक असल्याचे निवेदनात नमूद केले.
मात्र नागरिकांना केवळ मांस व मासे विक्रेत्यापासून दुर्गंधीला सामोरे जावे लागते असे नाही शहरातील गटारी व मुताऱ्याच्या परिसरात देखील अशा दुर्गंधीला सामोरे जावे लागते, विशेषता व्यापारी काळात या दुर्गंधीचे अधिक प्रमाणात आहे.
पालिकेकडून याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांना तक्रार करण्यास संधी मिळाली. मात्र आगामी नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीवरून प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या त्याच पद्धतीने राजकीय पक्षांना देखील हालचाली करण्यास संधी मिळाली
राजकीय पक्षांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा जनतेला भेडसावणाय्रा समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे, या स्टंटबाजीतून धार्मिक तेढ उद्भवत नाही परंतु वस्तुस्थिती काय आहे? याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.
- दिगंबर यादव, सामाजिक कार्यकर्ते