Sajana Marathi Movie Review: प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष वेगळा असतो तो समपातळीवर कधीच नसतो. काहींचा संघर्ष तर केवळ जगण्यापुरताच नसतोच तर तो माणसानं निर्माण केलेल्या समाजमान्यता अन् भेदभावाचा असतो. या संघर्षांमध्ये प्रेमाचा विषय तर वेगळाच! एखाद्यावर नुसतं प्रेम जडणं इतका हा विषय नक्कीच सोपा नसतो. तर त्यात समरुप होणं, विरघळून जाणं आणि त्यागाचा अंशही असावा लागतो. पण तरीही निसर्गाकडं मनातल्या आणि भावनेतल्या नजरेनं तुम्ही पाहिलतं तर त्यातले रंग तुमचं अस्तित्व राखण्याची प्रेरणा देतात.
SALMAN KHAN LATEST NEWS : शाहरुखनंतर आता सलमान खानचाही मोठा निर्णय, दबंग 'या' स्पोर्ट टीमचा झाला मालक, सोशल मीडियावर चर्चाअसं जगणं कदाचित आपण कधी अनुभवलंही नसेल पण त्याचा अनुभव 'सजना' हा मराठी सिनेमा आपल्याला देतो. प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांची ही कलाकृती आहे. निर्माता-दिग्दर्शक, कथा-पटकथा ही त्यांचीच. आपल्यातल्या अंगभूत चित्रकलेचं सत्व या चित्रपटात उतरवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. आजवर त्यांचा ब्लॅक कॅनव्हास अन् त्यावर रंगीत पेन्सिल-पेन अन् ब्रशच्या सहाय्यानं उतरवलेल्या जाणीवा चित्रप्रेमींना भुलवत आल्या आहेत. बराक ओबामा अन् आपले अंबानी-बिर्ला यांच्या घरांच्या दिवाणखाण्यात धोत्रेंची चित्र शोभा वाढवत आहेत, असो ही झाली दिग्दर्शकाची ओळख. यामुळेच त्यांच्या पहिल्यावहिल्या 'सजना' या सिनेमाकडं तुम्ही दुर्लक्ष नक्कीच करु शकत नाही. किमान धोत्रेंच्या चित्रांच्या ओढीनं तरी तुम्ही सिनेमा हॉलमध्ये येताच.
'मुलांनो मी आईला सोडून आंटीशी लग्न करु का?' रेशम टिपणीसच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने मुलांना केलेला प्रश्न, मुले म्हणाली 'बाबा तुमच्या...'सिनेमाचा नायक 'साजन' अर्थात अभिनेता आकाश सर्वगोड हा शशिकांत धोत्रेंचा कॅनव्हास, रंग, ब्रश आणि चित्रही आहे. रोहित शेट्टीचा सिनेमा जसा उठावदार रंगांनी भरलेला असतो तसा भास शशिकांत धोत्रेंच्या सिनेमातून होतो. नायक नायिकांच्या कपड्यांचं डिझाईन, त्यातले रंग अन् इतर पात्रांच्या अंगावरील कपडे हे वेगळेपण दाखवतात. आजवर धोत्रेंनी जी काही क्लासिक चित्रं साकारली आहेत त्याच्या फ्रेम्स या सिनेमात जिवंत होताना दिसतात. विशेषतः नायिकेच्या विविध प्रसंगांमधून. तृप्ती मोरेनं मुख्य नायिका अर्थात वंदनाची भूमिका समजून उमजून साकारली आहे. विहिरीतला सीन हा या रंगांच्या दुनियेत संगिताच्या मदतीनं अत्युच्च पातळी गाठतो. खरंतर पाण्यात रंग विखुरले जातात पण इथं नायक-नायिकेच्या रुपात ते एकरुप दिसतात.
वय हा फक्त आकडा आहे! ‘गाडी नंबर १७६०' मध्ये ॲक्शन सीन्स करताना दिसणार सुहास जोशीसंपूर्ण सिनेमाभर गीत, संगीत आणि रंग तुमच्याशी बोलत राहतात. ओंकारस्वरुपचं संगीत अन् पार्श्वसंगीत जबरदस्त झालं आहे. चित्रप्रसंग उचलून धरण्यासाठी यातल्या बॅकग्राऊंड स्कोअरचा मोठा वाटा आहे. गाणीही छान झाली आहेत, 'बुंगाफाईट' हे गाण थिरकायला लावतं, ते सैराटच्या झिंगाटचं पुढचं व्हर्जन वाटतं. केवळ या गाण्याच्या जोरावरही सिनेमाचं चांगलं प्रमोशन करता आलं असतं. यापूर्वी काही उत्सवांमध्ये हे गाण वाजलंही आहे. तसंच एक समाजदर्दी आवाजही या सिनेमात ऐकयला मिळतो तो म्हणजे कडूबाई खरात यांचा. 'माया भिमानं सोन्यानं भरली ओटी' गीतामुळं महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांच्या जोडीला नायक-नायिकेचं भावविश्व उलगडून सांगणारं सोनू निगमच्या आवाजतलं टायटल साँग आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजामुळं 'बुंगाफाईट' गाणं वेगळी उंची गाठतं. सिनेमात रणजीत मानेंचं छायाचित्रणही उत्तम झालं आहे. रात्रीचा काळोख, सूर्यफुलाची शेती अन् शुभ्र पक्षांचा थवा, दुसरीकडं केकताडाची झाडं अन् त्यात चित्रीत झालेले प्रसंग मनाला भिडतात. बाजारात चित्रित झालेलं गाण उठावदार झालं आहे, यात रंगांची मुक्तहस्त चित्राप्रमाणं रंगांची उधळणं दिसते.
कोण आहे 'तुला जपणार आहे' मालिकेतील मार्जरी साकारणारी कलाकार? 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने दिलाय आवाजवाजंत्रीचं मंदिरातील, सणाच्या दिवशी नैवेद्याचं अन् लग्नात पंगतीतून उठून जाणारा नायक ही दृश्ये अंगावर काटा आणतात. पुरोगामी महाराष्ट्राच्या गावखेड्यातलं आजही हेच वास्तव आहे. कितीही पुढारलेपणाचा आव आणला तरी आजही बहिष्कृताचं जगणं जगणारी आणि गावकुसाबाहेर राहणारी ही माणसं कर्तुत्ववान झाली, अगदी त्यांच्या अंगावर टाय जॅकेट, काळा कोट, खाकी वर्दी आली तरी त्यांना सोबत घ्यायला इथला दांभिक समाज तयार नसतो. हा क्लास आणि कास्ट डिफरन्सचा खेळही या सिनेमात अधोरेखित होतो. ग्रामीण पार्श्वभूमी असलेला प्रेमकथेवरील सिनेमा आला म्हणजे त्यात शहराच्या तुलनेत सामाजिक भेदांचा दाह हा पदोपदी असतो, तोच या सिनेमातही दिसतो.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांना "आय अॅम नॉट अॅन अॅक्टर" साठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारपहिलाच प्रयत्न असल्यानं अन् बराच काळ मेकिंगच्या प्रोसेसमध्ये सिनेमा अडकल्यानं आजच्या घडीला काही संदर्भ इथं जुने झालेले वाटतात. यापूर्वीचा सैराट, बबनची छापही सजनावर दिसत राहते. खूप काही वेगळेपण जाणवत नसल्यानं गाणी लक्षात राहत नाहीत. पालावर राहणाऱ्या माणसांचे कपडे आणि त्यांच्या झोपड्या या उगाच रंगीत करण्याचा केलेला अट्टाहास वाटतो, ब्लॅक अँड व्हाईट जीवन जगणाऱ्या या लोकांच्या जीवनात हेच दोन रंग असतात. मध्यांतरापूर्वी सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, पण नंतर तो अत्यंत पसरट होतो. एकतर सिनेमाची पटकथाच एका सरळ रेषेत जाणारी आहे, त्यातही कुठलेही प्रसंग उत्कंठा ताणवत नाहीत.
'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत तेजश्री प्रधानने दिलेला किसिंग सीन; ट्रोल झाल्यावर म्हणाली, 'याबाबतीत कुणीही...ट्रेलरमधून नायकाचं आधीचं आणि नंतरच रुप पाहून काही अंशी वेगळेपण वाटत राहतं पण प्रत्यक्ष सिनेमा क्लायमॅक्समध्ये फसतो. शेवट गोड दाखवायच्या नादात तो कनेक्टच होत नाही किंवा लक्षात राहण्यासाठी वेगळेपण दाखवत नाही. सिनेमात धड व्हिलनंही म्हणता येणार नाही असं दिन्याचं पात्र आहे, पण ते का आहे? आणि शेवटी त्याचं काय होतं? याचं उत्तर मिळत नाही. बऱ्याचदा अशा जागा सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठी राखीव ठेवलेल्या असतात, पण याबाबत अद्यापतरी कुठलीही स्पष्टता नाही. ज्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते त्यात मधुचंद्राची रात्र हा नायक-नायिकेच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असू शकतो, पण हा क्लायमॅक्सचा सीन कसा काय होऊ शकतो? हा ही पडलेला एक प्रश्नच आहे.
तरीपण शशिकांत धोत्रेंच्या चित्रांसाठी म्हणून 'सजना' एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन पाहायला हरकत नाही. उद्या शुक्रवार, २७ जून रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित होत आहे.