बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आपल्या दमदार आवाजामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. दरम्यान काही वर्षांपासून आपण सर्वांनी फोन कॉल करताना एक सावधानतेचा संदेश ऐकला होतो. 'सावधान रहा... सायबर ठगी से बचें..' हा आवाज ऐकला की कोणी सतर्क व्हायचं तर कोणाला ऐरिटेड व्हायचं. हा आवाज होता तो खुद्द बिग बींचा. मात्र आता हा कॉलर ट्यून ऐकू येणार नाही.
भारत सरकारने नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध करण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती. त्याचा एक भाग म्हणून कॉलर ट्यूनद्वारे अमिताभ बच्चन यांचा आवाज देण्यात आला होता. मात्र, एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, आता ही मोहीम आता संपली आहे आणि त्यामुळे बिग बींच्या आवाजाताली कॉलर ट्यूनही बंद करण्यात आलीय.
अलीकडे काही सोशल मीडिया युजर्सनी अमिताभ बच्चन यांना या कॉलर ट्यूनसाठी ट्रोल केलं होतं. बिग बींनी सुद्धा ट्रोलर्सला आपल्यार मजेशीर शैलीत उत्तर दिलं होतं:
'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया'एका ट्रोलरला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हमाले होते की, 'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया' परंतु ही कॉलर ट्यून सरकारच्या विनंतीवरून होती आणि ती बंद करण्याचा निर्णय सुद्धा सरकारी पातळीवर घेतला गेला आहे, ट्रोलर्समुळे नाही.
SALMAN KHAN LATEST NEWS : शाहरुखनंतर आता सलमान खानचाही मोठा निर्णय, दबंग 'या' स्पोर्ट टीमचा झाला मालक, सोशल मीडियावर चर्चा