राज्यात त्रिभाषा सूत्रामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, या निर्णयाचा विरोध जनतेसह अनेक नेत्यांनी केला. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही केला. यासंदर्भात आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, नेमकं काय घडलं? तसेच यावर मनसेची भूमिका काय? यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी त्यांनी ६ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. या मोर्चाला मराठी बांधवांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.