तुळजापूर : ‘गण गण गणात बोते’. ‘उदो बोला उदो’चा जयघोष करीत शेगावीचा राणा, संत गजानन महाजारांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (ता. २७) शहरात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
येथील धाराशिव रस्त्यावर नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह पालिकेच्या कम॔चाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. शहरातील कमानवेस, तुळजाभवानी मातेचे महाद्वार, भवानी रस्ता मार्गे पालखी लोहिया धर्मशाळेत मुक्कामासाठी आली.
तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात मंदिराचे सरव्यवस्थापक तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पालखीचे स्वागत केले. तुळजापुरात पालखी मार्गावर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. शहरातील कमान वेस, आर्य चौक येथे शेकडो किलो फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी करून नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. सोहळ्यातील वारकऱ्यांनी भजन, वेगवेगळ्या गीतांतून तुळजाभवानी मातेची आराधना केली.
पालखीच्या आगमनावेळी पावसाने हजेरी लावली होती. तथापि, वारकरी, भाविकांचा उत्साह जराही कमी झाला नाही. गैरसोयही झाली नाही. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व शक्तिपीठ तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाणारे भाविक एकत्र आल्याने प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झाला होता. शहरामध्ये ग्रामीण भागातील शेकडो भाविक गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी आले होते.
धाराशिवमध्ये अभिषेकधाराशिव ः संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (ता. २६) लेडीज क्लबच्या मैदानावर मुक्कामी होता. आज पहाटे तीनच्या सुमारास अभिषेक सुरू झाले. अभिषेकासाठी पहाटे दोनपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. साडेचापर्यंत अभिषेक, दर्शन झाल्यानंतर आरती झाली. पहाटे पाचच्या सुमारास पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान झाले. सकाळी नऊच्या सुमारास सोहळा वडगाव (सिद्धेश्वर) येथे विश्रांतीसाठी थांबला होता. तेथे वारकरी, भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था होती.
Ashadhi Wari 2025 : संत येती घरा, तोचि आम्हा दिवाळी दसरा! भगवानगडाच्या पालखी आगमनानिमित्त तागडगाव सजले मुक्कामास्थळी गर्दीपालखी शहरातील लोहिया धर्मशाळेत सायंकाळी मुक्कामासाठी आल्यानंतरही शहरासह तालुक्यातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रांगेची सोय होती. लोहिया धर्मशाळेत फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती. लोहिया सभागृहात वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था होती.