Bollywood News : "राजू (राजकुमार हिरानी) यांना विनोद आणि भावनांचा मिलाफ असलेली नाट्यप्रधान शैली सर्वाधिक आवडते," असे वक्तव्य आमिर खानने केले, जेव्हा त्याला दादासाहेब फाळके यांच्यावर येणाऱ्या बायोपिकमध्ये हिरानींसोबतच्या तिसऱ्या सहयोगाबद्दल विचारण्यात आले.
राजकुमार हिरानी— १००% यशाचा इतिहास असलेले नावाजलेले दिग्दर्शक — त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम केले आहेत. विनोद आणि संवेदनशीलतेचा अचूक समतोल साधणारे त्यांचे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. आता ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित बायोपिक घेऊन येत आहेत, ज्यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘३ इडियट्स’ आणि ‘पीके’ या ऐतिहासिक यशस्वी चित्रपटांनंतर, आमिर आणि हिरानी यांची ही तिसरी युती आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये मार्मिक विनोद, खोल भावनिक आशय आणि प्रभावी कथा-कथनशैली होती — हेच या जोडीचे वैशिष्ट्य मानले जाते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर म्हणाला,"राजू आणि अभिजात (जोशी, लेखक) यांचा विनोदाकडे कल आहे — आणि माझाही. आम्हा तिघांनाही विनोद खूप प्रिय आहे. राजूला ‘ड्रामा विथ ह्युमर’ ही शैली सर्वाधिक आवडते. त्यामुळे हाही चित्रपट त्या प्रकारात मोडेल, अशी शक्यता आहे."
View this post on InstagramA post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)
या बायोपिकचे चित्रिकरण ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू होणार असून, आमिर खान आपला आगामी चित्रपट सितारे ज़मीन पर प्रदर्शित झाल्यानंतर तयारी सुरू करणार आहेत. या चित्रपटाच्या दृष्य कल्पनांची निर्मिती लॉस एंजेलिसमधील आघाडीच्या VFX स्टुडिओंनी AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली आहे, जेणेकरून त्या काळाचे वास्तवदर्शी चित्रण करता येईल.
या चित्रपटाच्या पटकथेवर गेल्या चार वर्षांपासून काम सुरू आहे. ही कथा राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज यांनी एकत्र लिहिली आहे.
‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस ! निगेटिव्ह भूमिकेत 'हे' कलाकार