पत्नीच्या सततच्या जाचाला कंटाळून एका पीडित व्यक्तीने गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. नदीजवळील जीवनरक्षक दलाच्या जवानांनी पाहताच त्यांनी त्यांचे प्राण वाचवले. तसेच त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ही धक्कादायक घटना नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातून उघडकीस आली असून, या घटनेनंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अशोक कांबळेअसे पीडित व्यक्तीचे नाव आहे. २० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर बायकोने नवऱ्याचा छळ करण्यास सुरूवात केली. बायकोकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळालाल नवरा कटाळला होता. एवढेच नाही तर बायकोने पीडित व्यक्तीचा हात मोडला, तसेच डोळ्याचे नुकसाने केले.
NCP Youth Leader: पवार कुटुंबात लगीनघाई, युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा, सुप्रिया ताईंनी करून दिली सुनेची ओळखयाच त्रासाला कंटाळून अशोकने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी अशोक गोवर्धन घाट पुलावर गेला. नंतर गोदावरी नदी पात्रात उडी घेतली. तसेच आत्महत्येचा प्रयत्न केला. नदी पात्रात कुणीतरी बुडत असल्याचं लक्षात येताच जीवनरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच त्याचे प्राण वाचवले.
Beed News: बीडमध्ये भीषण अपघात! दुचाकी समोरासमोर आदळल्या; तिघांचा जागीच मृत्यू, बाईकचा चक्काचूरअशोकची प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तपासणीदरम्यान, पोलिसांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये त्याने बायकोकडून होणाऱ्या छळाबाबत नमूद केलं आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. पत्नीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.