संगमनेर : इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तृतीय भाषा म्हणून हिंदी विषय लागू करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, संगमनेरमध्ये रविवारी (ता. २९) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र निषेध नोंदवत बसस्थानक परिसरात हिंदी विषयाच्या निर्णयाची होळी केली. हा निर्णय सक्तीचा नसल्याचे सरकार सांगत असले, तरी ‘२० विद्यार्थी एकत्र येऊन हिंदी नको, म्हटल्यास इतर भाषा देता येईल,’ अशी अर्धवट व संभ्रम निर्माण करणारी अट देऊन सरकारने मराठी भाषकांचा अपमान केला आहे, अशी टीका करण्यात आली.
Ashadhi Wari 2025: 'माउलींच्या सोहळ्यात सहकुटुंब अन्नदान करणारा अवलिया'; भारत रामीनवार यांच्याकडून दहा वर्षांपासून सेवायावेळी माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी सरकारच्या या निर्णयावर कडाडून हल्ला चढवत म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी जीवन वाहून घेतले. त्या महाराष्ट्रातच आज मराठी भाषेचा दुस्वास केला जातोय. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी हळूहळू लादून मराठी माणसाला दुय्यम ठरवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. सरकारने अशा संभ्रम पसरविमाऱ्या धोरणांपासून दूर राहावे, अन्यथा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनातून निर्माण झालेली वज्रमूठ रस्त्यावर उतरेल आणि सरकारला जाब विचारेल.
या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर संघटक असिफ तांबोळी, शहरप्रमुख गोविंद नागरे, उपतालुकाप्रमुख सचिन साळवे, जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, विधानसभाप्रमुख अमोल डुकरे, तसेच अजीज मोमीन, विजय सातपुते, भाऊसाहेब वराळे, प्रकाश गायकवाड, अमित फटांगरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ashadhi Wari 2025: 'बरडनगरीत लोटला वैष्णवांचा जनसागर'; फलटणकरांचा माउलींना निरोप; आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार१०५ हुतात्म्यांनी प्राणांचे बलिदान देऊन महाराष्ट्र आणि मुंबई स्वाभिमानाने मिळवून दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे राज्यात हिंदीची सक्ती करून मराठी भाषेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही.
- अमर कतारी, माजी शहरप्रमुख, शिवसेना