Stock Market Opening Today: शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. सेन्सेक्स 32 अंकांनी घसरून 84,027 वर उघडला. निफ्टी 24 अंकांनी वाढून 25,661 वर उघडला. बँक निफ्टी 86 अंकांनी वाढून 57,529 वर उघडला. या वाढीमुळे बँक निफ्टीने नवीन उच्चांक गाठला.
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, आज जवळजवळ सर्व निर्देशांक स्थिर व्यवहार करत आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील बँका वगळता. त्यात एक टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. आज आयटी आणि ऑटो क्षेत्रात विक्री दिसून येत आहे.
आज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN), ईटर्नल, ट्रेंट, एल अँड टी (LT) आणि टेक महिंद्रा (TECHM) या कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत. बँकिंग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सकारात्मक बातम्यांमुळे हे शेअर्स वाढले.
कोणते शेअर्स घसरले?दुसरीकडे, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, कोटक बँक, भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) यांचे शेअर्स आज घसरताना दिसले. विशेषतः काही बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केली. तसेच, टेलिकॉम आणि ऑटो क्षेत्रातील काही संमिश्र बातम्यांमुळे या शेअर्समध्ये घसरण झाली.
अमेरिकन बाजारातही काल चांगली तेजी पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 जुलैची टॅरिफ डेडलाइन पुढे ढकलण्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांनादिलासा मिळाला. डाऊ जोन्स 430 अंकांनी वर गेला, तर S&P 500 आणि नॅस्डॅकने नव्या उच्चांकाला स्पर्श केला. या घडामोडींमुळे जागतिक बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
आज सकाळी जापानचा निक्केई निर्देशांक तब्बल 600 अंकांनी वाढला. GIFT निफ्टी स्थिर होता, तर डाओ फ्युचर्समध्ये 200 अंकांची तेजी दिसून आली.
कमोडिटी मार्केटमध्ये दबावजागतिक व्यापार संघर्षाचे सावट कमी होण्याची शक्यता वाढल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीत घसरण झाली. सोने सुमारे 50 डॉलर ने घसरून 3275 डॉलरवर आले, तर चांदी 1% नी खाली आली आहे. कच्च्या तेलातही थोडी घसरण पाहायला मिळाली असून ते 66 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे.
मान्सूनमुळे शेअर बाजाराला दिलासायंदा पावसाने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. सरासरी वेळेपेक्षा तब्बल 9 दिवस आधीच देशभरात पाऊस पोहोचला आहे. त्यामुळे शेती आणि ग्रामीण बाजारासाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
परदेशी गुंतवणूकदारांची माघारअलीकडे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीभारतीय कंपन्यांतील आपली हिस्सेदारी कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.