Latest Maharashtra News Updates : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक
esakal June 30, 2025 08:45 PM
Uddhav Thackarey Live: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक

बैठकीत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ

कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांकडे राजीनामा देण्यासाठी आग्रह

शिवसेनेत कोल्हापूर जिल्ह्यात खांदेपालट झाल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी

शिंदे गटात जाण्यासाठी बहुतांश शिवसैनिक आग्रही

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Live : विरोधकांनी टाळ वाजवत सरकारविरोधात केलं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून उद्धव ठाकरेंविरोधात फलक आणि घोषणा. विरोधकांनी टाळ वाजवत सरकारविरोधात केलं आंदोलन

Maharashtra : माघार सरकार,युटर्न सरकार ; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर 'मी मराठी'चा गजर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. माघार सरकार, यू टर्न सरकार अशा घोषणा दिल्या.

Satara : सज्जनगर रस्त्यावर झाड पडलं, वाहतूक ठप्प

साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडल्यानं सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय. गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा सुरू असल्याने झाड पडले. अद्याप प्रशासन झाड हटवण्यासाठी पोहचलेलं नाही.

Tuljapur : हॉटेल भाग्यश्रीमध्ये राडा, कामगार आणि तरुण यांच्यात हाणामारी

हॉटेल मधील कामगार व तरुणामध्ये झाली हाणामारी

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हॉटेल चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉच्युनर एसयुव्ही गाडी भेट दिल्यानंतर भाग्यश्री हॉटेल आले होते राज्यभर चर्चेत

नाद करतो काय यावचं लागतयं म्हणत सोशल मिडीयावर भाग्यश्री हॉटेलची चांगलीच चर्चा

Jalgaon : पूर्णा नदीत भराव टाकल्यानं पुराची भीती

पूर्णा नदीत टाकलेला भराव जैसे थे पडून विदर्भातून येणाऱ्या पूर्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झालाय. महामार्गाचे काम सुरू असताना भराव टाकण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांना कमी मोबदला दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करून काम बंद पाडले आहे. भराव पडून असल्याने नदीकाठच्या शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता तर मुक्ताईनगरला पूराचा विळखा पडण्याची भीती व्यक्त केली जातेय.

Pandharpur : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे व्हीआयपी दर्शन बंद

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आदेश दिले आहेत. देवाच्या व्हीआयपी दर्शनासाठी समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतलाय. 2010 मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याचा समितीला सूचना केल्या आहेत.

शाळकरी मुलांना दुसरा गणवेश १५ ऑगस्टपर्यंत मिळणार

सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तके आणि एक गणवेश आधीच वितरित करण्यात आला आहे. आता उर्वरित दुसरा गणवेश देखील १५ ऑगस्टपूर्वी देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा एकूण १२ लाख १५ हजार ३२८ पुस्तके जिल्ह्यात दाखल झाली असून, २ हजार ३३२ शाळांमधील विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळाली आहेत. शालेय समितीमार्फत गणवेश खरेदीची जबाबदारी यंदा पार पाडली जात असून, सध्या पहिला गणवेश बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनाही आठवड्याभरात गणवेश मिळणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे

कराड तालुक्यात गुटख्याची उघड विक्री; प्रशासन निष्क्रीय?

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही कराड तालुक्यात त्याची सर्रास उघड विक्री सुरू आहे. विशेषतः तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये रात्रीच्या अंधारात गुटख्याचा पुरवठा केला जातो. ठराविक टोळ्यांनी या व्यवसायात मक्तेदारी निर्माण केली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही गुटख्याची विक्री खुलेआम सुरू असल्याने विद्यार्थी सहजपणे या सवयीच्या आहारी जात आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही परिस्थिती केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं आव्हान ठरत आहे.

Kolhapur Politics : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी इंगवलेंची निवड; संजय पवार, देवणे, सुर्वे आज भूमिका करणार जाहीर

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर पक्षांतर्गत उपनेते संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे गटाकडून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या गटाला इंगवले यांची झालेली निवड अमान्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आज, सोमवारी भूमिका जाहीर केली जाणार आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झालेल्या नागपुरातील दोन वारकऱ्यांचा शाॅक लागून मृत्यू

नागपूर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झालेल्या नागपुरातील दोन वारकऱ्यांचा शॅाक लागून मृत्यू झाला. नागपूर राजाबाक्षा येथील मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे यांचा मृत्यू झाला. फलटणजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या दोन वारकऱ्यांचा शॅाक लागून मृत्यू झाला आहे. दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे.

11th Admission Process : 'अकरावी' प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश घेणे बंधनकारक

कोल्हापूर : जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील विविध २८७ महाविद्यालयांमध्ये उद्या, सोमवारपासून इयत्ता अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यापूर्वी या प्रक्रियेची माहिती घेण्यासह गुणवत्ता यादी पाहण्यासाठी रविवारी सुटी असूनही विद्यार्थी, पालकांनी त्यांच्या परिसरातील महाविद्यालयांमध्ये हजेरी लावली.

Narsobawadi Datta Temple : नृसिंहवाडी दत्त मंदिरातील पाणी आज उतरण्याची शक्यता

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात आठवडाभर दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने पाणी पातळी कमी जास्त होत आहे. आज समोरील बाजूस कृष्णा नदी पात्रासमोर मंदिरात दोन फूट पाण्यात राहूनच भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दरम्यान, नदीपात्रातील पाणी कमी होत असून, आज (ता. ३०) मंदिर दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे.

Rajesh Kumar Meena : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या सोमवारी (ता. ३०) निवृत्त होत असल्याने मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेशकुमार मीना उद्या (सोमवारी) दुपारी चार वाजता पदाची सूत्रे स्वीकारार आहेत.

Kavlesad Point : कावळेसाद पॉईंट सायंकाळी पाचनंतर पर्यटकांसाठी बंद

सावंतवाडी : आंबोली येथील कावळेसाद पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी पाचनंतर कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असली तरी, यामुळे पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. दुसरीकडे या निर्णयाने कावळेसाद पॉईंटवर होणारे जीवघेणे प्रसंग टाळण्यास मदत होणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून होणार सुरू

Latest Marathi Live Updates 30 June 2025 : राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आवाज उठवत वातावरण तापविल्यानंतर आज सरकारने या संदर्भात काढलेले दोन्ही शासननिर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, शेतकऱ्यांविषयीची सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत आणि विविध भ्रष्टाचारांमध्ये मंत्र्यांचा सहभाग असल्याचा निषेध करत विरोधकांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (ता. ३०) सुरू होत आहे. ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ५० जण जखमी झाले आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज निवृत्त होत असल्याने मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेशकुमार मीना आज दुपारी चार वाजता पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आंबोली येथील कावळेसाद पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी पाचनंतर कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.