पावसाळ्यात रोड ट्रिप चा प्लॅन करताय? मग 'ही' ठिकाणं तुमच्यासाठी आहेत बेस्ट
Tv9 Marathi July 05, 2025 11:45 AM

पावसाळा ऋतू सुरू झाला की चोहीकडे हिरवगार निसर्ग… आल्हाददायक वातावरण तसेच ओठांवर पावसाची गाणी तर अशा हवामानात बाहेर जाण्याची फिरण्याची एक मजा असते. तर या दिवसांमध्ये आपल्या रोजच्या जीवनातून एक ब्रेक घेऊन तुम्हीही कधीतरी पावसात प्रवास करायाल हवा. तर यासाठी रोड ट्रिप हा एकमेव चांगला पर्याय आहे. कारण या रोड ट्रिपमध्ये प्रवास करताना हलके पावसाचे थेंब, थंड वारे आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ कोणालाही मोहित करू शकते. पण अनेकदा प्रश्न पडतो की असे कोणते रस्ते आणि मार्ग आहेत जिथे गर्दी कमी असते आणि आपण पावसाचा आनंद घेऊ शकतो.

जर तुम्हीही रोड ट्रिप करण्यासाठी योग्य ठिकाणं शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण भारतात असे काही अद्भुत रोड ट्रिप मार्ग आहेत जे विशेषतः पावसाळ्यात आणखी मनमोहक दिसतात. तुम्ही साहसप्रेमी असाल किंवा शांततेत वेळ घालवायचा असेल तर हे मार्ग तुमचा प्रवास केवळ आनंददायीच बनवणार नाहीत तर तुमचा प्रवास संस्मरणीय देखील बनवतील. चला तर मग या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील अशा निवडक रोड ट्रिप ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जे पावसाळ्यात स्वर्गापेक्षा कमी दिसत नाहीत.

मुंबई ते गोवा रोड ट्रिप

पावसाळ्यात मुंबई ते गोवा रोड ट्रिप तुम्हाला एक संस्मरणीय प्रवास देऊ शकते. पावसाळ्यात गोव्याला जाणारा हा रस्ता इतका सुंदर आहे की तुम्हाला चित्रपटातील दृश्य पाहत असल्यासारखे वाटेल. आजूबाजूला पसरलेली हिरवळ, नारळाची झाडे, मोकळे आकाश आणि रिमझिम पावसाच्या सरी यामुळे हा रस्ता खरोखरच स्वर्गासारखा दिसतो. तर रोड ट्रिपच्या अंतराबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई ते गोवा हे अंतर 586.8 किमी इतका आहे. त्यानुसार, तुम्ही बाईक किंवा कारने या ट्रिपला जाऊ शकता.

बंगळुरूहून ऊटीला जा

बंगळुरू ते ऊटी हे अंतर 290 किमी आहे. तुम्ही तुमच्या गाडीने या ठिकाणी 6-7 तासांत पोहोचू शकता. पावसाळ्यात रोड ट्रिपसाठी देखील हा मार्ग सर्वोत्तम आहे. या मार्गावर तुम्हाला डोंगरावर पसरलेली हिरवीगार चादर याचे दृश्य पहायला मिळेल जे खरोखरच इतके सुंदर दिसते की तुम्ही ते पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा थांबाल. हा मार्ग इतका अद्भुत आहे की तुम्ही प्रत्येक क्षणी या ठिकाणाचे सौंदर्य तुमच्या कॅमेऱ्यात कैद कराल.

चंदीगडहून कसौली हा देखील एक चांगला पर्याय आहे

हिवाळा असो वा उन्हाळा, डोंगरावर जाण्याची मजा वेगळीच असते. पावसाळ्यात हलक्या पावसाच्या सरीतून तुम्ही रोड ट्रिपला जाऊ शकता. यासाठी तुम्ही चंदीगड आणि कसौलीचा मार्ग निवडू शकता. त्याचे अंतर 59 किमी आहे, जे तुम्ही सुमारे 2 तासांत पार करू शकता. येथे तुम्हाला सर्वत्र हिरवगार डोंगर दिसेल, ज्यामुळे तुमचा प्रवास आणखी संस्मरणीय बनू शकतो. तुम्ही आठवड्याच्या शेवटी या रोड ट्रिपचे नियोजन करू शकता.

उदयपूर ते माउंट अबू हा मार्गही उत्तम

पावसाळ्यात राजस्थान पाहण्यासारखे आहे. जर तुम्ही उदयपूरमध्ये राहत असाल किंवा फिरायला गेला असाल तर तुम्ही माउंट अबूला रोड ट्रिप करू शकता. पावसाळ्यात येथील दृश्य देखील खूप सुंदर असते. येथील रस्ते खूप चांगले असून रोड ट्रिपवर जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल. जर आपण येथील अंतराबद्दल बोललो तर उदयपूर ते माउंट अबू हे अंतर 161 किमी आहे, जे तुम्ही 2-3 तासांत पूर्ण करू शकता.

दिल्ली ते ग्वाल्हेर रोड ट्रिप

जर तुम्ही दिल्लीत राहत असाल किंवा रोड ट्रिपची योजना आखली असेल, तर ग्वाल्हेरला जाणे चांगले उत्तम आहे. पावसाळ्यात दिल्लीचे दृश्यही खूप सुंदर होते. ग्वाल्हेरच्या रोड ट्रिप दरम्यान तुम्हाला वाटेत मथुरा आणि आग्रा सारखी ठिकाणे आहेत जी तुमचा प्रवास संस्मरणीय बनवू शकतात. तुम्ही किमान एकदा तरी या रोड ट्रिपचा अनुभव नक्कीच घ्यावा. त्याचे अंतर सुमारे 361 किमी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.