टीम इंडियाने इंग्लंड क्रिकेट टीमला तिसर्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑलआऊट केलं आहे. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिल्या डावात 112.3 ओव्हरमध्ये सर्वबाद 387 धावा केल्या. इंग्लंडसाठी जो रुट, जेमी स्मिथ आणि ब्रायडर्न कार्स या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर टीम इंडियाठी जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाल्यानंतर झटपट 3 झटके दिले होते. त्यामुळे इंग्लंडला लवकर गुंडाळण्याची संधी होती. मात्र ब्रायडन कार्स याने अखेरच्या टप्प्यात अर्धशतक केलं. त्यामुळे इंग्लंडला 380 पार पोहचण्याच यश आलं.