इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडच्या 387 धावांच्या प्रत्युत्तरात 43 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 145 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. उपकर्णधार ऋषभ पंत आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल ही जोडी नाबाद परतली आहे. तिसरा दिवस हा या सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या जोडीवर तिसऱ्या दिवशी मोठी खेळी करण्याची जबाबदारी असणार आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला