सातपूर: नाशिक शहराला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पोषक वातावरण असून, आगामी काळात नाशिकमध्ये विविध औद्योगिक प्रकल्प येणार आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक गती अशी माहिती उद्योग, मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत औद्यागिक विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या इमारत लोकार्पण प्रसंगी मंत्री सामंत बोलत होते. याप्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, दिलीप बनकर, सरोज आहिरे, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बूब, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे, उपकार्यकारी अधिकारी संतोष भिसे, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, अधीक्षक अभियंता सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, इड्यूस पार्कचे प्रमुख कमलजित सिंग गुप्ता, संचालक डॉ. मुकुंद शिंदे, यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी उपस्थित होते.
उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे, या शासनाच्या संकप्लनेतूनच राज्यातील पहिल्या कौशल्य विकास केंद्राची सुरवात नाशिकमधून होत आहे. उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागणाऱ्या विकसित कौशल्ये आत्मसात केलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती या कौशल्य विकास केंद्रातून होणार आहे. राज्यात प्रत्येक विभागस्तरावर पाच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या तीन ते चार वर्षात ८ हजार विद्यार्थी प्रशिक्षित होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. प्रास्ताविक मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
उद्योगनिर्मितीत राज्य अग्रेसर : भुसे
उद्योग विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात उद्योगाची क्रांती निर्माण झाली असून नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर राहिले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व सुविधासह उत्तम प्रशिक्षण मिळणार असून कुशल कामगार तयार होणार असल्याची भावना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
Nashik Election News : भाजपच्या भरवशावर राहू नका, स्वबळावर लढण्याची तयारी करा; शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना निर्देशकौशल्ये आत्मसात करा : झिरवाळ
स्पर्धेत टिकायचे असेल, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्ये विद्यार्थांनी आत्मसात केली पाहिजेत. महिला उद्योजकांनी यात सहभागी होऊन पुढे येणे गरजेचे असल्याची अपेक्षा अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केली.