5 दिवसात सोन्या चांदीच्या भावात प्रत्येकी 2 हजार 500 रुपयांची वाढ
गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर जीएसटी विना सोन्याची भाव एक लाखांच्या पार
जळगाव सुवर्णनगरीत जीएसटी विना 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 800 रुपयांवर
जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 3 हजार 824 रुपयांवर
जीएसटी विना 22 कॅरेट सोन्याचे भाव 92 हजार 330 रुपयांवर तर जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचे भाव 95 हजार 99 रुपयांवर
चांदीचे भाव जीएसटी विना 1 लाख 17 हजार 500 रुपयांवर तर जीएसटी सह चांदीचे भाव 1 लाख 21 हजार 30 रुपयांवर
जळगाव लाडक्या गणरायाचे आगमनजळगाव लाडक्या गणरायाचे आगमन
अवघ्या दोन दिवसांवर आले असून त्यासाठी विविध वस्तू खरेदी करण्यासह बाप्पाला अर्पण करण्यासाठी चांदीचे दुर्वा, मोदक, फळं फुलांची गणेशभक्त खरेदी करीत आहे. सोबतच १० ग्रॅमपासून ते एक किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, बाप्पाचे वाहन मुषक, घंटी, दिवेदेखील उपलब्ध असून गणेशोत्सवामुळे या वस्तूंना मागणी वाढत आहे. दरवर्षी 'लवकर' येण्याची प्रतीक्षा लागलेल्या बाप्पाचे आगमन म्हणजे सर्वत्र नवचैतन्य घेऊन येणारे असते.
गणरायांचा आगमनात पूर्वीच नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊसगणरायांचा आगमनात पूर्वीच नंदुरबार मध्ये मुसळधार पाऊस...
सातपुडा परिसरात सलग सहाव्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग....
गणेशोत्सवाचा खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांची उडाली तारांबळ....
अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील नद्याना पूर....
सततच्या पावसामुळे पाणी पातळीत होणार वाढ..
Maratha Aarakshan: मराठा आरक्षण आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचं आंदोलनही मुंबई धडकणारमराठा आरक्षण पाठोपाठ आता शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन धडकणार आहे. कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाची रणनीती ठरली असून सरकारला दोन महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय. सुरुवातीला विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत.त्यानंतर 28 ऑक्टोबरला मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.राज्यातील सर्वपक्षीय संघटनांसह शेतकरी संघटना देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
Dombivli: डोंबिवलीत आनंदी कला केंद्राच्या मूर्तिकार पसार; गणेश भक्तांचा संतापडोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी येथे गणेश मूर्तींची बुकिंग केली होती. मात्र, जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली. अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहेत. दरम्यान, गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून, संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत...
Pune Satara: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ हरिश्चंद्री गावाजवळ वाहतूक कोंडीगणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी.
गावी निघालेल्या गणेश भक्तांची वाहनं एकाचवेळी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय
पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त राहणारे नागरिक, गणेशोत्सवासाठी घरी निघालेले असल्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गाड्या एकाच वेळी रस्त्यावर आल्यात.... त्यातच हरिश्चंद्री येथे महामार्गावर उड्डाणं पुलाच कामं सुरू असल्यानं अशा प्रकारे वाहनांच्या रांगा लागल्याच चित्र पहायला मिळतयं
पुण्याहून-साताऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या ह्या लांबचं लांब रांगा लागल्यात..
महामार्गावर ठिकठिकाणी अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळतीय
सामाजिक कार्यकर्ते निलेश निकम यांनी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात टाकला कचरापुण्यातील गोखले नगर जनवाडी भागातील कचरा उचलला नसल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश निकम यांनी कचरा महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात टाकला.
गोखलेनगर जनवाडी भागात दोन दिवसापासून कचरा उचलला जात नाही
वेळोवेळी तक्रार करूनही महापालिका दुर्लक्ष करत आहे याचा निषेध करण्यासाठी परिसरातील कचरा आयुक्तांच्या दालनात टाकला
Chandrapur: जरांगेयांच्याविरुद्ध चंद्रपुरात ओबीसींचे आंदोलनमराठा आंदोलन प्रणेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपच्या ओबीसी विभागातर्फे चंद्रपुरात निदर्शने करत निषेध करण्यात आला. भाजपाचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे यांचा सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा हट्ट पूर्ण होवू देणार नसल्याचा इशाराही जीवतोड यांनी दिला.
Cotton Price: सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ केल्यानंतर भाव अकराशे भाव घसरलेकेंद्र सरकारने 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर पर्यंत कापसावरील सर्वच्या सर्व 11 टक्के आयात शुल्क माफ केल्याने देशांतर्गत कापसाचे भाव 1100 रुपयांनी कोसळले आहेत. सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असून देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संपवणारा आहे. केवळ अमेरिकेला खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे.
Nagpur: नागपुरात कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन...संविधान चौकात भीक मांगो आंदोलन..
सर्वांनी काळ्या टीशर्ट घालून नोंदवला निषेध..
विदर्भातील कंत्राटदार यांनी एकत्र येत केले आंदोलन
शासनाने काम करून पैसे न दिल्यानं रस्त्याच्या कडेला उबजे राहत केले आंदोलन
भीक मागत करत आहे आंदोलन
Pune-Bengluru: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगागणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण भागामध्ये निघालेल्या वाहनधारकांना आता ट्राफिक जामचे समस्येला समोर जावे लागत आहे.त्यामुळे टोल नाक्यावर वाहनधारक आणि टोल प्रशासनामध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत.
भंडारादरा आणि निळवंडे धरण अखेर काठोकाठ भरलेअहिल्यानगर जिल्ह्यातील 11 टीएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण अखेर काठोकाठ भरले आहे.. धरणातून 3552 क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.. भंडारदरा पाठोपाठ 8 टीएमसी क्षमता असलेले निळवंडे धरण देखील ओव्हरफ्लो झाले असून धरणातून 1500 क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आवश्यकता भासल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..
मराठा , ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश...!बीड जिल्ह्यात मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्नावरून आंदोलन केले जात असताना प्रशासनाकडून जमाबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यातून एखादी अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे जिल्हाधिकाऱ्यां कडून हे आदेश काढण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी जरांगे पाटील यांच्या भेटीलाराजेंद्र साबळे मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटी मध्ये दाखल.
जरांगे पाटलांना मुंबई आंदोलनावर चर्चा करून मागे घेण्यासाठी विनंती करण्याची शक्यता
अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रा उत्सव सुरूअष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रा उत्सव सुरू आहे. या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात आणि भाविकांना गणपती ला जल अभिषेक करता येतो त्यामुळे या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगाव येथे दाखल झाले आहेत. वर्षभरातील भाद्रपद व माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते.
Kolhapur: कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमकप्रशासक 'जवाब दो या चले जाओ' म्हणत पालिकेत घुसणार
कोल्हापूर महानगरपालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवला
शहरातील शंभर कोटी रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल विचारणार जाब
Ranjangaon: रांजणगाव महागणपतीत भाद्रपद महोत्सवाला सुरुवातअष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव महागणपती मंदिरात भाद्रपद महोत्सवाला मंगलमय सुरुवात झाली. पहाटेपासूनच महागणपतींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. धार्मिक विधी, महाअभिषेक, आरती आणि कीर्तन-भजनांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघाला असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. स्थानिक कलाकार, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा सहभाग भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा देणार आहे.
शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय झाला पक्कासोलापूर शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे.त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाला सोलापुरात मोठं खिंडार पडणार आहे.शिवाजी सावंत यांच्या रूपाने भाजपने शिंदे सेनेचा एक मोठा नेता गळाला लावला आहे.यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात मोठा कार्यक्रम घेऊन शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश होणार आहे.दरम्यान,शिवाजी सावंत यांच्यासह अनेक नेते संपर्कात असल्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही दावा केला आहे.
Mumbai-Goa: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी० माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
० माणगाव पासून 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प
० कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा फटका
० कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न
० वाहनांची वाढलेली संख्या आणि माणगाव मधील अरुंद रस्त्यामुळे कोकणवासीयांची कोंडी
Kokan: तळकोकणात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांचा उत्साह शिगेला...तळकोकणात एक दिवस अगोदरच गणपती बाप्पाचे आगमन होत असून भक्ताचा उत्साह शिगेला पोचला आहे. सध्या कोकणात भातशेती बहरून आली आहे आणि याच शेतातून वाट काढत आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणले जात आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे स्वागत केले जात आहे. चाकरमानी सुद्धा तळकोकणात दाखल झाले असून मोठ्या उत्साहात गणेशाचे आगमन होत आहे. एकूणचं सिंधुदुर्गात भक्तीमय वातावरण असून गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोचला आहे.
Godavari: गोदावरीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकाची सुखरूप सुटका- रामकुंड परिसरात गोदावरीच्या पुराच्या पाण्यात अडकला होता एक जण
- गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला पुन्हा पूर
- रामकुंड परिसरात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण अडकला होता पुराच्या पाण्यात
- अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढत केली सुखरूप सुटका
Amravati: अमरावती जिल्ह्यात पिकांना पावसाचा जोरदार बसला फटकाजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे आत्तापर्यंत 45 हजार हेक्टर क्षेत्र बाधित..
या दरम्यान 5 व्यक्तींचा मृत्यू ,तर 38 जनावर दगावली..
याशिवाय जिल्हाभरात 921 घरांची देखील पडझड झाली.
तूर,कपाशी,सोयाबीन पिकांचे या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान..
अनेक ठिकाणी शेती गेली खरडून
Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यतापोलिसांच्या संपर्कात 7 ते 8 महिला असल्याची माहिती
या महिलांचे प्रांजल खेवलकरने संबंध ठेवताना, सहमती नसताना, चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलेय.
त्याचं बरोबर अक्षेपार्य व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळून आलेत
आक्षेपार्य व्हिडिओ फोटोज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी 7 ते 8 महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती
सदर महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती
Baramti: बारामती नगरपरिषद हद्दीतील अनाधिकृत इमारत पाडण्यास सुरुवात..बारामती नगरपरिषद हद्दीतील रुई येथील तानाईनगर येथील अनधिकृत इमारत बांधकाम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भुसे यांच्या आदेशानुसार पाडण्यास सुरुवात झाली आहे . सदरची इमारत ही बेकायदेशीर असल्याचे मत नगरपालिकेचे असल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जातय..
गेल्या सात दिवसापासून कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा प्रभावीत...आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत, जिल्ह्यातील जवळपास सातशे कर्मचारी अधिकारी संपर्क केल्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रभावी झाली आहे, मात्र अजूनही यांच्या मागण्या संदर्भात तोडगा निघाला नसल्याने आज जिल्ह्यातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले आहे.. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून बहुतांशी कर्मचारी हे आरोग्य विभागात सेवा देत आहेत, मात्र अजूनही त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आलेले नाही.. याच मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे.. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आल्याच पाहायला मिळत आहे...
वाकड परिसरामध्ये खास महिलांसाठी गौतमी पाटीलच्या उपस्थितीत दहीहंडीचा आयोजनपिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये खास महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी दहीहंडी च आयोजन करण्यात आलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. पूर्वी एक दिवस चालणारा दहीहंडी उत्सव आता हळूहळू आठवडाभर महाराष्ट्रभर साजरा करत असल्याचा चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.
गणपती उत्सवा निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील कोकणात 73 एसटी बसेस रवाना...राज्यातील सर्वात महत्ववाचा उत्सव म्हणजे गणेश उत्सव... हा उत्सव संपूर्ण राज्यात धुमधडक्यात साजरा करण्यात येतो, त्यातही गणेश उत्सव कोकणात सर्वात मोठा उत्सव मानल्या जातो , हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य भरातून लाखो भाविक जात असतात.. भाविकांना दलावं वळणाची सुविधा व्हावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 73 बसेस कोकणात रवांना झाल्या आहेत.. मात्र जिल्ह्यातील एसटी फेऱ्या वर कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती विभगीय नियंत्रक अधिकारी शुभांगी शिरसाठ यांनी दिली आहे..
65 वर्षीय शेतकरी पाच वर्षापासून मारतोय जलसंधारण विभागाच्या चकराबुलढाणा जिल्ह्याच्या किन्ही सवडत येथील शेतकरी प्रकाश धुरंदर हे 65 वर्षीय शेतकरी तलावात आपली शेती गेल्याने त्याचा मोबदला मिळावा ,म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यालयात मागील पाच वर्षांपासून चकरा मारत आहेत .. त्यांना त्यांच्या शेतीच मोबदला अद्याप मिळाला नाही .. मात्र, कार्यालयात अर्ज करण्यासाठी आणि चकरा मारण्यासाठी त्यांचे 50 हजार रुपयांचे वर पैसे खर्च झाले .. शेतकरी प्रकाश धुरंदर यांची वैरागड शिवारात शेती असून त्याठिकाणी तलावाचे काम सुरू आहे . या तलावाचे बाधित क्षेत्रात त्यांची 22 गुंठे शेती गेली आहे , विहीर गेली, सिताफळ ची झाडे गेलीय .. मात्र जलसंधारण चे अधिकारी त्यांना कधीं 8 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात तर कधी 12 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात.. तर शेतकरी धुरंदर आपल्या संपूर्ण शेतीचे पैसे द्यावे, अशी मागणी वेळोवेळी करत आले असून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळत आहेत.. शिवाय जलसंधारण अधिकारी कार्यालयात कधीच राहत नसल्याचे ही शेतकरी धुरंदर सांगताय . आता न्याय कोणाला मागायचा असाही प्रश्न त्यांनी केला असून शेतीच मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली ..
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यूछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोडवरील ताहेरपूर येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय,रामदास बाजीराव वाघ असे मयताचे नाव आहे.पाटेगाव येथील रामदास बाजीराव वाघ हे डोंबाऱ्याचा खेळ व फूल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. काही कामानिमित्त दुचाकीने पैठणच्या दिशेने जात असताना ताहेरपूर येथे त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन बिडकीन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांस तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद बिडकीन पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
नागपुरात सणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली- अभिषेक लखनसिंग लोधी आणि आयुष अरविंद शर्मा अशी अटकेतील आरोपींचे नाव आहेय..
- जबलपूर मार्गावरून येत असलेल्या मोटरसायकला बसस्टँड चौकात थांबवले... त्यावेळी चालकाने चकमा देण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलं...
- तपासणीत बॅगेत 20 किलो गांजा (किंमत अंदाजे 5 लाख) आढळून आला. मध्यप्रदेशातून छत्तीसगडला विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली..
- दोघांना मोटरसायकल आणि मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास कामठी पोलीस करत आहे.
छत्रपती संभाजीनगर: प्रमोद पाडसवान हत्याकांड प्रकरणी तीन आरोपींची वाढ रात्री उशिरा दोघे ताब्यात तर आरोपी करताच बहीण पसारप्रमोद पाडसवान यांच्या हत्येत सोमवारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आणि कुटुंबाच्या जबाबानंतर सहा आरोपीं व्यतिरिक्त याप्रकरणात तीन आरोपी वाढवण्यात आले. यात मंडळाचा अध्यक्ष अरुण गव्हाड, मंगेश वाघ व हल्लेखोर निमोनेची बहीण जयश्री यांना आरोपी करण्यात आले. यापैकी अरुण व मंगेशला ताब्यात घेण्यात आले. तर आपल्याला आरोपी करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच जयश्री पसार झाली. तिघांवर हत्ये दरम्यान हल्लेखोरांना मारण्यापासून थांबवण्या ऐवजी मृत व जखमींना पकडून ठेवत हत्येसाठी अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री शंभूराज देसाईपालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील दोन महामार्गां बाबत रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपन्यांना इशारा दिला आहे अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा-कोल्हापूर आणि कराड-चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यामध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गाचे काम 26 मार्च 2026 पर्यंत तर कराड- चिपळूण मार्ग येत्या डिसेंबर 2025 पर्यंत दिलेल्या अवधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाविषयीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 दिवसाला बारचार्ट सादर करावा. अन्यथा दिलेल्या अवधित काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासनाचा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारवाई करणार प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणार असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
धाराशिवमध्ये बोगस मतदार नोंदणी प्रकरण तापलेधाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचा प्रकरण चांगलंच तापले.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि तुळजापूरचे पराभूत उमेदवार यांनीही भाजपवर निशाणा साधलाय.तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरच आपला बोगस मतनोंदणी प्रकरणात संशय असल्याचं धीरज पाटील म्हणाले.विधानसभा निवडणुकीपूर्वी तुळजापूर मतदार संघात 6000 बोगस नोंदणीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आलं होतं. बोगस मतदार नोंदणी प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल असून नऊ महिने झाले तपास झाला नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याची धीरज पाटील यांनी सांगितलं दरम्यान ज्यांच्यावर आरोप होतायत त्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हायला हवी आणि तपास यंत्रणा त्या करतील असं मत व्यक्त केले.
Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखलबीडच्या गेवराई मध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून चपला फिरकवण्यात आल्या होत्या तर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते आणि यानंतर पोलिसांनी सुमोटो नुसार 14 आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही सहभाग आहे.
धाराशिवमध्ये चिमुकल्या हातांनी साकारले पर्यावरणस्नेही बाप्पाआपला गणपती आपण बनवूया" या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत धाराशिवच्या कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील ३०० मुलांनी स्वतःच्या हातांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या. मुलांचा प्रचंड उत्साह,निरागसता आणि पर्यावरण रक्षणाची लागलेली गोडी पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केलय.आपल्या लहानग्या हातांनी मातीचा गोळा घेऊन त्याला बाप्पाचा आकार देताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.मूर्ती कशी बनवावी,सोंड कशी लावावी, डोळे कसे काढावेत अशा असंख्य प्रश्नांनी मुलांनी प्रशिक्षकांना भंडावून सोडले. मुलांचा गोंधळ, मूर्ती पूर्ण करण्याचा त्यांचा अट्टाहास आणि शिकण्याची उत्सुकता पाहून प्रशिक्षकही काही काळ स्तब्ध झाले मात्र, त्यांनी अत्यंत संयमाने आणि शांतपणे प्रत्येक मुलाला मार्गदर्शन करत त्यांच्याकडून सुबक गणेशमूर्ती तयार करून घेतल्या.
मोकाट कुत्र्यांच्या समस्येसह पाळीव कुत्र्यांसाठी सुद्धा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची अधिसूचना जारी- पाळीव कुत्र्यास बाहेर नेताना तोंडाला जाळी लावणे बंधनकारक, गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता आवश्यक,
- कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यास बंदी, फक्त मनपा घोषित ठिकाणीच परवानगी,
- पाळीव कुत्र्यांना नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर बसवल्यास लोकांना त्रास झाल्यास कारवाई होणार...
- पाळीव कुत्रा जाळीशिवाय आढळल्यास कुत्रा मोकाट समजून मालकावर कारवाई होणार,
- उपद्रव झाल्यास नागरिकांनी 112 वर संपर्क साधावा प्राणिप्रेमींनी अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
- अनेक मालक नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कुत्र्यांना आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये फिरवतात हे पाळीव श्वान इतरांना चावा घेतात. यावर कारवाई होणार.
- अनेकदा कुत्र्यांना अनधिकृतपणे खाऊ घालणारे लोक किंवा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला प्राणिप्रेमींकडून विरोध केल्यास कठोर कारवाई होणार..
गणेशोत्सवसाठी नागपूर पोलीस सज्ज, सुरक्षेच्या दृष्टीने 5 हजार पोलीस असणार तैनात- सायबर पोलीस, ड्रोन, CCTV च्या माध्यमातून पोलिसांचे असणार गणेशोत्सवावर लक्ष
- गुप्तचर यंत्रणा, एटीएस, बिडीडीएस विभागाची गर्दीवर असणार बारीक नजर
- नागपूर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे चौदाशे गणेश मंडळांना दिली आहे परवानगी...
- गणेश मंडळांना पोलीस विभागाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे करावे लागणार पालन...
- डीजेचे नियम मोडले तर होणार थेट जप्तीची कारवाई होणार...
नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे.....कॉंग्रेसची दुबार नावे वगळण्याची मागणीनवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत तब्बल ७६ हजार दुबार नावे असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ऐरोली मतदारसंघात ४१,५५६ तर बेलापुरात ३५ हजारांच्या आसपास दुबार नावे आढळली आहेत. एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या मतदारसंघात असून मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा नियोजित घोळ असल्याचा आरोप करून सर्व दुबार नावे वगळावीत, अशी लेखी मागणी जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी, ठाणे यांच्याकडे केली.
बीडच्या गेवराई मध्ये लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडालक्ष्मण हाके यांनी गेवराई मध्ये येऊन दंड थोपटले त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांकडून दंडके दाखवण्यात आले यानंतर आम्हीही गप्प बसणार का पोलिसांनी बागेची भूमिका घेतली आम्ही आमदार विजयसिंह पंडित यांच्या सोबत आहोत गेवराई मधील धनगर समाज देखील विजयसिंह पंडित यांच्या सोबत आहे लक्ष्मण हाके यांना ओपन चॅलेंज आहे की मी एक वंजारा म्हणून सांगतो की मी विजयसिंह पंडित यांच्या सोबत असून तुम्ही उद्या गेवराई मध्ये या तुम्हाला मी दाखवतो तुम्ही विदेशी पंडित यांना काय दांडक्याची भाषा करता असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे
ट्रेन पकडण्यासाठी दिवेकर कोकणवासियांची मोठी गर्दी..गणेशोत्सवात सर्वाधिक कोकणवासीय कोकणाकडे जाताना पाहायला मिळतात मात्र कोकणवासी यांना हाच कोकणाचा प्रवास अनेक अडचणींचा सामना करत करावा लागत आहे ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असून मिळेल त्या जागेवर कोकणवासीय बसून आपला प्रवास करत आहेत एकंदरीतच मोठ्या प्रमाणात हाल कोकणवासियांचे प्रवासादरम्यान होताना पाहायला मिळत आहेत
यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने डिजेमुक्त साठी कसली कंबरयवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यंदा आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी मंडळांनी सामाजिक बांधिलकी परंपरा जोपासत पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी. असे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचे मूल्यांकन करून विविध प्रकारचे बक्षीस दिले जाणार आहेत जास्तीत जास्त मंडळांनी स्पर्धेत सहभागी नोंदवावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नयेमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली. त्याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस कडून ओबीसी समाजासाठी काढलेल्या मंडल यात्रेतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी मांडली. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर मनोज जरांगेनी दिल्ली गाटावी आणि मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत चर्चा करून कायदा करावा असा सल्ला दिला. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी पूर्ण करायला राज्याचे मुख्यमंत्री अपुरे पडतायत असं राज राजापूरकर म्हणाले.मंडल यात्रा धाराशिव इथ आली असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली .
माथेरानच्या रस्त्याची दुरावस्था, पर्यटक आणि टॅक्सी चलकांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे प्रवासमाथेरानच्या घाट रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जोरदार पावसादरम्यान पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पाण्याच्या वाहताळीमुळे रस्ता खड्डेमय झाला आहे. पडलेले खड्डे आणि रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे अपघाताची भिती वाढली आहे. नेरळ ते माथेरान दरम्यान सात किलो मिटरचा हा घाट रस्ता असून बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती करीत नसल्याचा आरोप टॅक्सी संघटनेकडून केला जात आहे. पदरमोड करीत टॅक्सी संघटना रस्त्याची तात्पुरती डागडुजी करीत असून माथेरानचे पर्यटनात्मक महत्व लक्षात घेऊन शासनाने याकडे लक्ष द्याव अशी मागणी केली जात आहे.