Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...
esakal September 14, 2025 02:45 AM

आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारत-पाकिस्तान सामन्यावरून गोंधळ सुरू आहे. आशिया कपमध्ये दोन्ही संघांची 'महाभिडत' १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना रद्द करण्यासाठी संपूर्ण भारतात मोहीम सुरू झाली आहे. राजकीय पक्षही याला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत, हा सामना रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हातात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करणार का? तर नाही. कारण भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या हातात नाही. या संदर्भात, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्वतः एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आशिया कपबाबत भारत सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे बोर्ड पालन करेल. त्याच वेळी, भारत सरकारने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळण्याबाबत एक नवीन धोरण लागू केले होते.

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

त्या धोरणात असे म्हटले होते की, भारतीय संघ बहुपक्षीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत खेळेल. परंतु त्यांच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही. भाजपचे अनुराग ठाकूर यांनीही तीच गोष्ट पुन्हा सांगितली आहे. आशियाकप सामना रद्द करायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे भारत सरकारच्या हातात आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावरून विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Ranji Trophy: पृथ्वी शॉपाठोपाठ भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलूनेही धरला महाराष्ट्राचा हात; ऋतुराजच्या संघाची वाढणार ताकद

सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने कायद्याच्या विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली. त्या याचिकेत असे म्हटले होते की, पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांनंतर पाकिस्तानसोबत सामना खेळणे म्हणजे प्राण गमावलेल्या लोकांचा आणि शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचा अपमान करण्यासारखे असेल. भारत-पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता थेट प्रक्षेपित केला जाईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.