विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती काहीच लागत नाही. हातचा माणूस निघून जाऊ शकतो. तेव्हा घाबरून न जाता योग्य उपाय करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात ग्रामीण आणि शहरी भागातही साप चावण्याच्या घटना घडतात. पण सर्वच साप हे काही विषारी नसतात. काही विषारी असतात. सापाने जर अचानक हल्ला केला तर तात्काळ हे उपाय करणं फायद्याचं आहे.
साप दिसल्यावर अगोदर काय कराल?
जर शेतात, घरामध्ये वा मैदानात साप अचानक दिसला तर काय कराल? घाबरू नका. जितके शांत राहाल तितके चांगले. साप अचानक समोर आला तर त्याच्या जवळून पळून जाण्याचा प्रयत्न तर मूर्खपणा ठरेल. हळू हळू त्या ठिकाणाहून दूर होणे हे चांगले आहे. सापाला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. नाहक त्याला अंगावर घेण्याचे काम करू नका. कारण एखादा चपळ साप भीतीपोटी तुमच्यावरही हल्ला करू शकतो. साप लागलीच मनुष्यावर हल्ला करत नाही.
सापाने चावले तर कसे ओळखाल?
तज्ज्ञांच्या मते, साप चावल्यावर त्या ठिकाणी, त्या अंगावर दोन छिद्रासारखी चिन्ह दिसतात. याशिवाय अत्यंत वेदना होतात. तो भाग सुजतो. लाल होतो आणि तिथे आग होते. जर साप जास्त विषारी असेल तर मग ही लक्षण अधिक दिसू शकतात. जसे की
ही लक्षणं दिसायला काही तास पण लागू शकतात. अशावेळी सर्वात अगोदर डॉक्टराकडे धाव घ्या. भोंदूबाबाकडे अजिबात जाऊ नका. स्वतः एकदा उपचार करण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. त्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
लागलीच काय कराल?
काय करु नये?