विकासासाठी, न्यायासाठी
एकजुटीने लढाः बाळ माने
रत्नागिरी, ता. १६ ः जनतेच्या प्रश्नांसाठी, स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी एकजुटीने लढण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे.
रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ठाकरे शिवसेनेच्या कार्यक्रमावेळी भाजपच्या रत्नागिरी ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहत शिवबंधन बांधले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी उपनेते बाळ माने यांनी शिवसेनेच्या विचारधारेबद्दल आणि जनआस्थेबद्दल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली. तसेच शहर विकास, सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.