इंडिगो एअरलाइन्सच्या संकटामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा, जबाबदार डीजीसीए अधिकाऱ्यांची बडतर्फी आणि इंडिगोच्या सीईओंना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.
ALSO READ: इंडिगोच्या 200 हुन अधिक उड्डाणे रद्द, 10 विमानतळांवर अधिकारी तैनात
मुंबईतील कुलाबा येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी इंडिगो एअरलाइन्स, केंद्र सरकार आणि डीजीसीएवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, विमान वाहतूक क्षेत्रातील वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार आणि एअरलाइन्समधील कथित संगनमत यामुळे हे संकट निर्माण झाले. ही एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. हे सर्व केंद्र सरकार आणि डीजीसीएने इंडिगोला दिलेल्या सवलती आणि हलगर्जीपणामुळे घडले. असे देखील ते म्हणाले.ALSO READ: महायुती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवेल-उपमुख्यमंत्री शिंदे
Edited By- Dhanashri NaikALSO READ: शिवसेनेचे २२ आमदार भाजपमध्ये सामील होणार! आदित्य ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्रात राजकीय गोंधळ