पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं काल (बुधवारी, ता 28) विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आहे. मुंबईहून अजित पवार हे निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी बारामतीकडे निघाले होते. मात्र विमान लँडिगदरम्यान दुर्घटना घडली आणि अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनाने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. दादांचा मिश्किल अंदाज, दिलखुलासपणा, वक्तशीरपणा या सर्व गोष्टी आणि त्यांची कामाची पध्दत यामुळे ते कायमच लोकप्रिय राहिले आहेत. अशातच अजित दादांचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दादा काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे, असंं बोलत होते, हा अजित दादांचा व्हिडीओ भाजप नेते महेश लांडगे यांनी शेअर केला आहे. दादा त्यावेळी नेमकं म्हणाले होते? जाणून घ्या.(Ajit Pawar Death Baramati Plane Crash Marathi News)
हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना समाजाला देणं लागतो, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबकता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, असं अजित दादा आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाले होते. भाजप नेते महेश लांडगे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Ajit Pawar Death Baramati Plane Crash Marathi News)
View this post on Instagram
अजित पवार खाजगी विमानाने काल (28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. या घटनेदरम्यान, बारामतीत लँडिंगपूर्वी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, सरकारच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आहे?, याबाबत माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar Death Baramati Plane Crash Marathi News)
सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
विमानात भीषण आग लागली
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.