बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या गूढ भविष्यवाण्या आणि विलक्षण दृष्टीमुळे त्यांना अनेकदा बाल्कनचे नास्त्रेदमस असे संबोधले जाते.
जागतिक राजकारण, नैसर्गिक आपत्ती, युद्धे आणि आर्थिक उलथापालथी यांसारख्या अनेक मोठ्या घटनांचा अंदाज त्यांनी आधीच वर्तवला होता असा दावा केला जातो. त्यांच्या काही भविष्यवाण्या प्रत्यक्षात घडून आल्याचा अनुभव असल्यामुळे आजही जगभरातील लोक त्यांच्या विधानांकडे गांभीर्याने पाहतात.
सध्या जग आर्थिक अस्थिरता, वाढती महागाई, बाजारातील चढ-उतार आणि भू-राजकीय तणाव यांमुळे आधीच अस्वस्थ आहे. अशा परिस्थितीत बाबा वेंगांनी केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित भविष्यवाण्या पुन्हा एकदा लोकांमध्ये चिंता निर्माण करत आहेत.
बाबा वेंगांनी आपल्या भविष्यवाण्यांमध्ये जगाला मोठ्या प्रमाणावर कॅश क्रॅशचा सामना करावा लागेल असा इशारा दिला होता. त्यांच्या मते, एक असा काळ येईल जेव्हा कागदी नोटांचे महत्त्व संपुष्टात येईल आणि लोकांना रोख पैशांची तीव्र टंचाई भासेल. अशा आर्थिक संकटाच्या काळात सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूच सर्वात सुरक्षित आधार ठरतील असे त्यांनी सांगितल्याचे मानले जाते.
गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचला तर चांदीने 4 लाख रुपये प्रति किलो हा टप्पा पार केला.
या वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून या धातूंचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
यामुळेच अनेक लोक बँक बचत, एफडी आणि रोख पैशांपेक्षा सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे अधिक वळताना दिसत आहेत.