IND vs SA: भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत रवि शास्त्री यांनी केलं भाष्य, कमकुवत बाजूबाबत स्पष्ट सांगितलं
Tv9 Marathi February 22, 2026 04:45 AM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खऱ्या अर्थाने हायव्होल्टेज सामने सुरू झाले आहे. सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तगडं आव्हान असणार आहे. या फेरीत पहिलाचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. मात्र हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला. पण यामुळे दोन्ही संघांचं गुणांचं समीकरण बिघडलं आहे. असं असताना भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? उत्सुकता आहे. दुसरीकडे, भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये काय बदल करणार याचीही चर्चा रंगली आहे. कारण अभिषेक शर्माची खेळी निराशाजनक असल्याने भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. असं असताना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी प्लेइंग 11 बाबत भाष्य केलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरावं याबाबत सांगितलं आहे.

रवि शास्त्री यांनी आयसीसीच्या रिव्ह्यूवर भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत सांगितलं की, ‘मला असं वाटतं की भारतासाठी एक सकारात्मक बाब आहे. ती म्हणजे प्रत्येक सामन्यात कोणत्या कोणत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. इशान किशन असेल.. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव असेल… तिलक वर्माने योगदान दिलं आहे. त्याने चांगली सुरुवात केली आहे. पण मला वाटते की त्याची चांगली कामगिरी अद्याप येणं बाकी आहे.’

‘अभिषेक शर्मा तिन्ही सामन्यात शून्यावर बाद होणं सकारात्मक बाब आहे. कारण या स्पर्धेतील योग्य वेळी त्याला चांगली कामगिरी करता येईल. संघ या बाबतीत थोडे चिंतीत असतील. कारण त्याने धावा केलेल्या नाहीत.’ असंही रवि शास्त्री म्हणाले. त्यामुळे रवि शास्त्री यांनी अभिषेक शर्मावर विश्वास टाकला आहे, असं दिसत आहे. दुसरीकडे, नेदरलँडविरुद्धचा संघच मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. फार तर वॉशिंग्टन सुंदरला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण अफ्रिकन संघाबाबत बोलताना रवि शास्त्री म्हणाले की, ‘त्यांच्या आणि आपल्या फलंदाजीतही खोली आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत. त्यामुळे एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ 22 फेब्रुवारीला भिडतील.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.