तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण काही फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरते. थंड तापमानामुळे ही फळे लवकर खराब होतात, चव बदलते, पोत मऊ किंवा कठीण होते किंवा पोषक तत्त्वे कमी होतात. ही फळे रूम टेम्परेचर (खोलीच्या सामान्य तापमानात) ठेवली तर जास्त काळ ताज्या राहतात आणि चांगली पिकतात. चला जाणून घेऊया कोणती फळे फ्रिजबाहेरच ठेवावीत.
न कापलेले अख्खे अननस फ्रिजमध्ये ठेवू नका. ते खोलीच्या तापमानात चांगले राहते आणि नैसर्गिकरित्या पिकते. कापलेले अननस मात्र एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रिजमध्ये ठेवा, अन्यथा ते लवकर खराब होते.
उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज रोज येतात. अख्खे (कापलेले नसलेले) कलिंगड फ्रिजमध्ये ठेवता येईल, पण कापलेले कलिंगड किंवा खरबूज फ्रिजमध्ये ठेवू नता. थंडीमुळे त्यातील पाणी सुकते, चव फिकी होते आणि पोत मऊ होतो.
लीची फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते. लीची उष्णकटिबंधीय फळ असल्याने खोलीच्या तापमानातच ताज्या आणि गोड राहते. फ्रिजबाहेरच ठेवा.
आंब्याचा सीझन सुरू झाला की बरेच लोक कच्चे आंबे फ्रिजमध्ये ठेवतात, पण हे पूर्णपणे टाळा. कच्चा आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो नीट पिकत नाही आणि चव खराब होते. आंबा पूर्ण पिकल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवता येईल.
पपई शक्यतो फ्रिजबाहेरच ठेवावी. जास्त पिकलेली पपई काही दिवस फ्रिजमध्ये ठेवता येईल, पण कच्ची किंवा अर्धपिक पपई फ्रिजमध्ये ठेवल्यास ती नीट पिकत नाही आणि चव कमी होते. उन्हाळ्यात विशेष काळजी घ्या.