आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतातील व्यवसायावर झाले आहेत, नांदेडमधील मिनरल पाणी बॉटल तयार करणाऱ्या व्यवसायावर याचे परिणाम दिसून येत आहेत. बॉटल साठी लागणारे रॉ मटेरीयलची आयात बंद आहे.प्रीफॉर्म, कॅप, लेबल, रॅपर रोल यांचे 60 टक्क्याने दर वाढले आहेत. त्यामुळे बॉटलीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार नाही तर रिटेलर आणि डीलर यांना बसणार आहे. पूर्वी 85-90 रुपयांना मिळणारे पाण्याचे बॉक्स आज 100-120 रुपयांना विक्री होतं आहेत. दरम्यान अशीच युद्धाची परिस्थिती राहिली तर व्यवसाय बंद होण्याची भीती मिनरल बॉटल व्यावसायिक शैलेश कऱ्हाळे यांनी व्यक्त केली आहे.
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती