WITT Summit 2026 : लोक विचारतात तुम्ही कुणासोबत आहात? PM मोदींनी एका वाक्यात दिले उत्तर
Tv9 Marathi March 24, 2026 12:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) या समिटमध्ये भाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मागील दोन WITT कार्यक्रमांची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाली होती. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने या समिटचे उद्धाटन झाले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केले. जगातीस संकटाच्या काळात भारत कुणासोबत आहे? यावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

भारताने प्रत्येक संकटाचा सामना केला

पंतप्रधाननरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, तुम्ही मागच्या पाच सहा वर्षाकडे पाहा. कोरोनाच्या नंतर आव्हाने एकामागून एक वाढत आहेत. असं एखादं वर्ष नाही की ज्याने भारताची, भारतीयांची परीक्षा घेतलेली नाही. पण 140 कोटी देशवासियांच्या एकजूटीच्या प्रयत्नाने भारताने प्रत्येक संकटाचा सामना करून मार्गक्रमण केलं आहे. या काळात युद्धाच्या परिस्थितीत भारताची नीती आणि रणनीती पाहून, भारताचं सामर्थ पाहून जगातील अनेक देश अचंबित आहे.

आम्ही शांततेच्या बाजूने – पंतप्रधान

जागतिक परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, ’28 तारखेपासून जगात उलथापालथ सुरू आहे. या कठीण प्रसंगातही भारत पुढे जात आहे. या 23 दिवसात भारताने रिलेशनशीप क्षमता दाखवली आहे. निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आहे. संकट व्यवस्थापनाची क्षमताही दाखवली आहे. आज जग विखुरलं आहे. भारताने अभूतपूर्व आणि अकल्पनीय ब्रिजेस तयार केले आहे. गल्फपासून ग्लोबल देशापर्यंत ग्लोबल साऊथ पासून शेजारी देशापर्यंत भारत सर्वांचा विश्वासू पार्टनर आहे. काही लोक विचारतात तुम्ही कुणासोबत आहात. त्यांना एकच उत्तर आहे, आम्ही भारताच्या बाजूने आहोत. शांततेच्या बाजूने आहोत. भारताच्या हिताच्या बाजूने आहोत. संवादाच्या बाजूने आहोत.’

सरकार नागरिकांच्या बाजूने – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘संकटाच्या या काळात जेव्हा जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. भारताने डायव्हर्सिफिकेशन आणि रेजिलिएन्सचं मॉडेल सादर केलं आहे. ऊर्जा असेल, खते असेल किंवा अत्यावश्यक वस्तू असतील. आपल्या नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी भारताने निरंतर प्रयत्न केला. अजूनही करत आहे. राष्ट्रनितीही राजनीतीचा आधार असेल तर देशाचं भवितव्य सर्वोच्च असतं.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.