मुंबई : देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याच्या अफवा जर कुणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अशा अफवा पसरवून जर कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम आहे असंही फडणवीस म्हणाले.
आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, "शहरांमध्ये महानगरच्या माध्यमातून पीएनजी गॅस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचं काम जलदगतीने सुरू आहे. त्यासंबंधी सरकारने एक आदेश काढलेला आहे. शहरांवरील एलपीजीचा लोड कमी करून पीएनजीवर भर दिला जाणार आहे. पीएनजीमुळे एलपीजीची भविष्यात समस्या किंवा अडचण येणार नाही.
आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. जरी तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन होणार असल्याच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर कारवाई केली जाणार आहे."
आखाती युद्धामुळे देशात इंधन तुटवड्याची झळ बसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गॅस खरेदीसाठी एजन्सीबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. याच संदर्भात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं. कदाचित पुढच्या तीन महिन्यात एलपीजी गॅस पुरवठा बंद होईल असं मोठं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलं आहे. केंद्राच्या पत्राचा हवाला देत भुजबळांनी ही माहिती दिली. येत्या काळात एलपीजी ऐवजी पीएनजीवर भर देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. संभाव्य एलपीजी तुटवट्याचं संकट लक्षात घेता पीएनजी जोडणीवर भर देण्याच्या सूचना भुजबळांनी दिल्या आहेत.
ही बातमी वाचा: