गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली.
दरम्यान, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत तापमानात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच पुणे, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात हवामान 32 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पावसानंतर आता विदर्भातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान 41 ते 42 अंश सेल्सियस पर्यंत वाढू शकते, असा अंदाज आहे.
दुसरीकडे मराठवाडा, विदर्भातही अशीच स्थिती राहू शकते. परंतु मराठवाड्यातील लातूरसारख्या काही भागात 9 एप्रिल रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा वाढू शकतात.