पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
admin April 09, 2026 10:25 PM
[ad_1]
पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहात आणि पैसा कोणत्याही रिस्क विना वेगाने वाढवू इच्छीत असाल तर पोस्ट ऑफीसच्या काही योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतात. खास बाब म्हणजे यातील गुंतवलेल्या पैशाला सरकारी गॅरंटी असते आणि योग्य काळानंतर निश्चित रिटर्न मिळतो. यातील एक योजना अशी आहे ज्यात निश्चित काळात तुमचा पैसा डबल होतात. तर दुसरी स्कीम टॅक्स बचतीसह चांगले व्याज देते. चला तर दोन्ही योजनांची माहिती घेऊयात..

किसान विकास पत्र ( KVP )

किसान विकास पत्र ( KVP ) पोस्ट ऑफिसची सर्वात प्रसिद्ध योजनेपैकी एक आहे. या योजनेचा हेतू लोकांना दीर्घ काळासाठी सेव्हींगसाठी प्रेरित करणे आहे.

काय आहे या योजनेची खासियत ?

या योजनेत तुमची गुंतवणूक ९ वर्षे ५ महिन्यात डबल होते. या योजनेत व्याजदर ७.५ वार्षिक हिशेबाने वाढत जातो.

किसान विकास पत्र (KVP) कसे काम करते ?

समजा तुम्ही एक लाख रुपये किसान विकास पत्र मध्ये गुंतवले. या योजनेत वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळते. खास बाब म्हणजे हे व्याज चक्रवाढ ( व्याजावर व्याज ) पद्धतीने वाढते.म्हणजे दर वर्षी जे व्याज मिळते, ते स्वतंत्र मिळत नाही, त्याऐवजी मूळ रकमेला जोडले जाते. नंतर पुढच्या वर्षी त्या वाढलेल्या एकूण रकमेवर पुन्हा व्याज मिळते.

किसान विकास पत्राची वैशिष्ट्ये ?

किमान गुंतवणूक – १००० रुपये

कमाल गुंतवणूक – कोणतीही मर्यादा नाही.

कोण गुंतवणूक करु शकतो – कोणताही भारतीय नागरिक

कागदपत्रांची आवश्यकता – PAN ( ५० हजाराच्या वरील रक्कम ), १० लाखावरील रक्कम ( इन्कम प्रुफ )
सुरक्षा: भारत सरकारची गॅरंटी. ही स्कीम त्या लोकांसाठी आहे जे विना जोखीम पैसे डबल करण्याऐवजी फिक्स रिटर्न आणि टॅक्स वाचवू इच्छीतात.

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकीट्स (NSC) –

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकीट्स (NSC) देखील पोस्ट ऑफिसची एक सुरक्षित स्कीम आहे. परंतू यातही पैसे डबल होण्याच्या ऐवजी फिक्स रिटर्न आणि टॅक्स बचत मिळते.

NSC च्या गरजेच्या बाबी –

व्याज दर: ७.७ टक्के वार्षिक

लॉक-इन पीरियड: ५ वर्षांचा आहे, मात्र, ९ वर्षे ते ३ महिन्यात पैसे डबल होऊ शकतात.

किमान गुंतवणूक : १,००० रुपये

कमाल मर्यादा – कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढे हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. मात्र, आयकर अधिनियम कलम ८० सी अंतर्गत टॅक्स सुट केवळ १.५ लाख प्रति वर्षापर्यंतच्या गुंतवणूकीवरच मिळते.
जर तुम्ही National Savings Certificate ( NSC ) मध्ये ५ लाख गुंतवणूक करत आहात आणि हे पैसे डबल केव्हा होणार याची माहिती कळण्यासाठी आपण कम्पाऊंड व्याजाचा फॉर्म्युला वापरावा लागेल.

M = P (1 + r/100)^n.

या फॉर्म्युल्यात P तुमची गुंतवणूक असते. r व्याजदर असतो आणि n वर्षांची संख्या असते. येथे p = ५,००,०००, r = ७.६ टक्के आणि आम्ही n काढायचा असेल म्हणजे पैसे १०,००,००० रुपये बनतील. वास्तविक NSC चा अवधी केवळ पाच वर्षांचा असतो. यामुळे तुमची पहिली गुंतवणूक पाच वर्षांनंतर मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला त्या रकमेस पुन्हा त्याच योजनेत गुंतवावे लागेल.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.