RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
GH News April 11, 2026 01:16 AM

कॅप्टन रजत पाटीदार याने केलेलं चाबूक अर्धशतक आणि अखेरच्या क्षणी वेंकटेश अय्यर याच्या इम्पॅक्ट खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात 200 पार मजल मारता आली. आरसीबीने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्ससमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने राजस्थान रॉयल्स विरूद्ध 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 रन्स केल्या आहेत. राजस्थान आणि बंगळुरु दोन्ही संघांनी या मोसमात खेळलेले आपले सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता कोणत्या संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आरसीबीची अखेरच्या 17 चेंडूत निर्णायक फटकेबाजी

राजस्थानने आरसीबीला 18 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 166 रन्सवर आठवा झटका दिला. त्यामुळे आरसीबी 200 पार पोहचेल असा कुणी विचारही केला नसेल. मात्र त्यानंतरही आरसीबीने जोरदार कमबॅक केलं. आरसीबीला 200 पार पोहचवण्यात वेंकटेश आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी अखेरच्या टप्प्यात प्रमुख भूमिका बजावली. तसेच वेंकटेश याने भुवनेश्वर कुमार याच्यासह नवव्या विकेटसाठी 17 बॉलमध्ये नॉट आऊट 35 रन्सची पार्टनरशीप केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.