कर्नाटकातील यादगिरी येथे शुक्रवारी धावत्या कारचा टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या बसला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारला तात्काळ आग लागली आणि त्यातील प्रवाशांना वाचण्याची संधीच मिळाली नाही.
शुक्रवारी, कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली. सुरपूर तालुक्यात शांतापुरा क्रॉसजवळ एक कार आणि एका खासगी बसची समोरासमोर धडक झाली. कारमधील १० पैकी ९ जण जळून खाक झाले. मृतांमध्ये पाच निष्पाप मुलांचा समावेश होता.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेइकल (SUV) चा टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरच्या पलीकडून येणाऱ्या एका खाजगी बसला धडकली. कारला आगीचा भडका उडाला.
ALSO READ: महाराष्ट्रात २३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तर सांगली-सोलापूरमध्ये पावसाचा इशारा; मंत्री गिरीश महाजन म्हणाले.....
अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण १० जण होते. आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की आत अडकलेल्यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नऊ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. धडक इतकी जोरदार होती की बस आणि कार दोन्ही पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: अशोक खरात प्रकरणातील मुख्य साक्षीदार जितेंद्र शेळके यांच्या मृत्यू; सुषमा अंधारे म्हणाल्या, "या अपघातात षडयंत्राचा वास येत आहे"