मोठी खळबळ! भारतीय जहाजांवर फायरिंग होताच सरकारची मोठी कारवाई, इराणच्या… जगाचं लक्ष आता भारताकडे
GH News April 19, 2026 01:13 AM

इराण आणि अमेरिकेत तणाव वाढलेला असताना होर्मुज सामुद्रधुनीतून जात असताना एका भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी नौदलाकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना समन्स पाठवले आहे. भारतीय टँकरवरील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सरकारने हा पाऊल उचलले आहे. हा हल्ला ओमानजवळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या या कडक भूमिकेनंतर इराणचे राजदूत मोहम्मद फहहाली तात्काळ परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

भारताकडून मोठी कारवाई

समोर आलेल्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीत इराकमधून तेल घेऊन जाणाऱ्या दोन जहाजांवर हल्ला झाला. यातील एक जहाज भारताचे होते, ज्यावर इराणी नौदलाने गोळीबार केला. यानंतर भारताने इराणी राजदूतांना समन्स बजावत घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली करत निषेध व्यक्त केला. या जहाजांवर सुमारे 20 लाख बॅरल इराकी तेल लोड केलेले होते. या घटनेनंतर परिसरातील तणाव अधिक वाढला आहे. आधीपासूनच अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव सुरू असताना आता होर्मुज परिसर अत्यंत संवेदनशील बनला आहे.

युद्धामुळे इराणमध्ये गोंधळाची परिस्थिती

भारताचा हा तेल टँकर होर्मुजजवळून जात असताना त्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र यात मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. सूत्रांच्या मते, सध्या इराणमध्ये युद्धामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या विविध लष्करी युनिट्समध्ये पूर्ण समन्वय नसल्याने अशा घटना घडत आहेत. यापूर्वी अमेरिकेकडूनही अशा प्रकारे चुकून स्वतःच्या किंवा सहयोगी जहाजांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

इराणकडून होर्मुझ पुन्हा बंद

शनिवारी सकाळी इराणने होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केल्याची घोषणा केली होती. मात्र आता पुन्हा होर्मुझ बंद करण्यात आला आहे. इराणचे म्हणणे आहे की अमेरिकेने इराणी बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीच्या प्रत्युत्तरात हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या मार्गावर पुन्हा कडक नियंत्रण लागू करण्यात आले आहे. त्यानंतर आता व्यापारी जहाजांना होर्मुजमधून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.