मुंबई महानगरपालिकेतर्फे १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत शहराच्या हरित पट्ट्याचे रक्षण करण्यासाठी 'वृक्ष संजीवनी' अभियान मोठ्या उत्साहात राबवले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सुमारे २९.७५ लाख झाडांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांचे आयुष्य वाढवणे हे या मोहिमेचे प्राथमिक ध्येय आहे. सिमेंटच्या जंगलात अडकलेल्या झाडांना पुन्हा 'श्वास' घेता यावा, यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. तसेच बीएमसीच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये हे अभियान एकाच वेळी राबवले जात आहे.
अभियानांतर्गत करण्यात येणारी कामे
काँक्रीटमुक्त झाडे: झाडांच्या मुळांभोवती असलेले सिमेंट-काँक्रीटचे थर काढून तिथे माती टाकली जात आहे, जेणेकरून मुळांना पाणी आणि हवा व्यवस्थित मिळेल.
खिळे आणि फलक हटवणे: झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरातींचे फलक, अनधिकृत केबल्स आणि दोरखंड काढून झाडांना इजा होण्यापासून वाचवले जात आहे.
शास्त्रीय छाटणी : पावसाळ्यापूर्वी धोकादायक फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी केली जात आहे.
लाल मातीचा वापर: काँक्रीट काढलेल्या जागी 'सैल लाल माती' भरली जात आहे, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होईल.
ALSO READ: मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले
या मोहिमेत केवळ पालिका कर्मचारीच नाही, तर स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे झाडांच्या संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होत आहे. हे अभियान 'जागतिक पृथ्वी दिना'चे (२२ एप्रिल) औचित्य साधून राबवले जात आहे. यामुळे मुंबईतील वृक्षांना 'नवसंजीवनी' मिळून शहर अधिक हिरवेगार होण्यास नक्कीच मदत होईल.
‘वृक्ष संजीवनी’ अभियान म्हणजे काय?
हे अभियान विशेषतः शहरी भागातील झाडांची आरोग्य तपासणी, उपचार आणि संरक्षण यावर केंद्रित आहे. मुंबईसारख्या महानगरात वाढत्या प्रदूषण, बांधकाम आणि हवामान बदलामुळे झाडांवर ताण येतो—त्यासाठी ही पुढाकार घेतली आहे.
याचा फायदा काय?
शहरातील हरित क्षेत्र टिकवून ठेवणे
हवेची गुणवत्ता सुधारणा
पर्यावरणीय संतुलन राखणे
नागरिकांमध्ये झाडांबद्दल जागरूकता वाढवणे
ALSO READ: महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य! उपजीविका जाणार का? काय म्हणाले मंत्री सरनाईक
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: ''मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना न्यायालयात कायदेशीररित्या उत्तर देईन" बनावट जात प्रमाणपत्राच्या वादावर सहर शेख म्हणाल्या