Ujani Dam : शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून आलेगाव येथे कोरड्या पडलेल्या भीमा नदीपात्रात सुरू असलेले आंदोलन आज संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पॉवर हाऊस साठी 1600 आणि भीमा नदीत 1400 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
आलेगाव येथे गेले नऊ दिवसापासून कोरड्या पडलेल्या भीमा नदीपात्रात सुरू असलेले आंदोलन आज संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पॉवर हाऊस साठी सोळाशे आणि भीमा नदीत चौदाशे क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. काल रात्री पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर हे पाणी सोडण्यात येणार होते. मात्र आलेगाव येथे गेले नऊ दिवसापासून भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या आंदोलनामुळे काल हे पाणी सोडता आले नव्हते. आज अखेर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर कमी प्रमाणात पाणी सोडण्याची मागणी मान्य केली आहे.
आज भीमा नदी मध्ये उजनी धरणातून एकूण सहा हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यात येणार होते ते कमी करून आता 3000 क्युसेक विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. आमच्या भागात जास्त क्षमतेने पाणी सोडल्यास थांबणार नाही अशी मागणी या ग्रामस्थांची असल्याने अखेर प्रशासनाने सहा हजार क्युसेक ऐवजी 3000 क्युसेक विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू आता पाण्याचा विसर्ग येत्या काही दिवसात वाढवण्यात येणार आहे.