अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा
admin April 28, 2026 12:26 AM
[ad_1]

जर तुम्ही तुमच्या प्रीपेड मोबाईल नंबरला ९० दिवसांहून जास्त वेळ रिचार्ज केले नाही तर आणि नंबर इनएक्टीव्ह ठेवला तर टेलिकॉम कंपन्या तुमचा नंबर अन्य युजरला अलॉट करु शकतात. एकदा सिम बंद झाल्यावर आणि कोणा दुसऱ्याला नंबर अलॉट झाल्यानंतर तुमच्या हातात काही राहात नाही. तुम्ही त्या नंबरला पुन्हा तुमच्या नावावर करु शकत नाही.मात्र, आता TRAI च्या नव्या नियमानुसार केवळ २० रुपयात तुम्ही तुमचा नंबर कार्यरत ठेवू शकता. कसे ते पाहूयात….

जुलै २०२४ पासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लान महाग केले आहेत. ज्यामुळे दोन सिम वापरणारे बहुतांशी युजर त्यांचा सेकेंडरी नंबर रिचार्ज करु शकत नाहीत. मात्र, तुमच्याकडेही एखादा सेकेंडरी नंबर असेल, ज्याला तुम्ही कमी खर्चात एक्टीव्ह ठेवू इच्छीत आहात तर तुम्हाला केवळ २० रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे केवळ २० रुपये खर्च करुन तुम्ही तुमचा Jio, Airtel वा Vodafone Idea चा नंबर दीर्घकाळ सक्रीय ठेवू शकता.

काय आहे फॉर्म्युला ?

दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जर कोणत्या नंबरला ९० दिवसांपर्यंत वापरले गेले नाही वा रिचार्ज केला नाही आणि त्यात २० रुपयांचे बॅलन्स असेल तर टेलिकॉम ऑपरेटर २० रुपये कापून पुढील ३० दिवसांपर्यंत नंबर एक्टीव्ह ठेवतील. जर तुमच्याकडे असा कोणताही सेकेंडरी क्रमांक आहे, ज्याला तुम्ही कमी वापरता वा वारंवार रिचार्ज करु इच्छीत नाही,तर त्यात २० रुपयांचा बॅलन्स ठेवावा. असे केल्याने तुमचा नंबर पुढील अतिरिक्त ३० दिवसापर्यंत एक्टीव्ह राहू शकतो. म्हणजे १२० दिवसांपर्यंत नंबर बंद होणार नाही.

याशिवाय तुम्ही तुमच्या नंबरला जिओ, एअरटेल वा व्होडाफोनच्या वॉईस ओन्ली वाल्या स्वस्तातल्या प्लानसोबत रिचार्ज करु शकता. असे केल्याने तुमच्या नंबरवर कॉलिंगच्या सोबत इनकमिंग आणि आऊट गोईंग एसएमएसची सुविधा देखील मिळेल. खाजगी टेलिकॉम कंपन्या ८४ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंत व्हॉईस ओन्ली प्लानची ऑफर करत असतात.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.