Jalgaon car Accident : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात साखरपुडा झालेल्या तरुणीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू तर दोघे भाऊ गंभीर जखमीझाले आहेत. शिखा विनायक बेलसरे असे साखरपुडा झालेल्या मयत तरुणीचे तर मीना मानकर तिच्या मयत वहिनीचे नाव आहे.
या घटनेत तरुणीचे दोन्ही भाऊ देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शिखा बेलसरे हिचा रोजी 21 एप्रिलला साखरपुडा झाला होता, 8 मे ला लग्न होतं, मात्र लग्नापूर्वीच काळाने घाला घातला.वणी येथे सप्तशृंगी गडावर लग्नाची पत्रिका ठेवून परतत असताना बांबरुड येथे कारचे टायर फुटल्यानंतर कार रस्त्याखाली उतरून कार झाडावर आढळल्याने अपघात झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम वरुन छत्रपती संभाजी नगर ते नागपूर या जुन्या महामार्गावर अपघाताची घटना समोर आली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शेवदी फाट्यावर भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक खाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कंटेनर जालन्यावरुन कारंजा कडे येत होता. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने कंटेनर खाली दबून असलेल्या चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढूले. सुनील विष्णू पवार (वय 48) रा. सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच नाव आहे.