Fuel Price Hike India : सरकार इंधनाच्या दरांमध्ये बदल करण्याच्या दिशेने गंभीरपणे विचार करत आहे. वरिष्ठ सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपये इतकी वाढ होऊ शकते. तसेच, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder rates) किमतीत ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, गेल्या सुमारे चार वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेल दरात होणारी ही पहिलीच वाढ ठरेल. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले असले, तरी २०२२ पासून देशांतर्गत इंधनाचे किरकोळ दर मोठ्या प्रमाणात स्थिर ठेवण्यात आले होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम आशियातील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या जागतिक किमतींवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरवाढीबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसला, तरी पुढील ५ ते ७ दिवसांत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Pump Storage Projects : विजेचं टेन्शन मिटणार! महाराष्ट्रात 70 हजार मेगावॉट वीजनिर्मितीसाठी अदानी-टाटांसोबत मोठे करार; 3.8 लाख कोटींची गुंतवणूककच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल विपणन कंपन्यांवर (OMCs) आर्थिक ताण वाढू लागला आहे. सध्या या कंपन्या वाढलेला खर्च स्वतःच सहन करत असून, त्याचा पूर्ण भार ग्राहकांवर टाकलेला नाही. परिणामी, त्यांच्या ‘अंडर-रिकव्हरीज’मध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे दरांमध्ये बदल करण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आला आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या महागाईचा परिणाम सरकारच्या वित्तीय स्थितीवरही होत आहे. अनुदानावरील वाढता खर्च आणि महसुलातील संभाव्य घट यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारमध्ये सध्या अंतर्गत पातळीवर चर्चा सुरू असून, आर्थिक स्थैर्य राखणे आणि ग्राहकांवरचा भार कमी ठेवणे या दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये संतुलन साधण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.
Haj Airfare Hike : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी! विमानभाड्यात १०,००० ची वाढ; AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले, केंद्र सरकारवर केली सडकून टीका"महागाईवर होणारा परिणाम शक्य तितका मर्यादित राहील, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे," असे या चर्चेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले. दरवाढीला मंजुरी मिळाल्यास, ती टप्प्याटप्प्याने आणि विचारपूर्वक लागू केली जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून किरकोळ महागाईत अचानक वाढ होणार नाही.
विशेषतः अन्नधान्याच्या किमती आधीच वाढलेल्या असताना, सरकार सावध भूमिका घेत आहे. अंतिम निर्णय हा प्रामुख्याने आगामी काही दिवसांत जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारे बदल आणि तेल उत्पादक देशांतील भू-राजकीय परिस्थिती यावर अवलंबून असणार आहे.