सांगायचं झालं तर, घरच्या परिस्थितीमुळे आणि कमी वयात लग्न झाल्यामुळे छाया यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. मात्र वय वाढत असताना देखील काही जणांना शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. कारण आजच्या जगात स्वतःला टिकवायचं असेल तर, शिक्षण फार महत्त्वाचं आहे.
शिक्षणाचं महत्त्व छाया यांना देखील पटलं, म्हणून त्यांनी 2024 साली दहावीची परीक्षा देत उत्तीर्ण झाल्या तर यंदा बारावीची परीक्षेत 60.17 टक्के मिळवत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाल्या आहेत.. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे.