समीर रिझवी याने अखेरच्या क्षणी केलेल्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 48 व्या सामन्यात 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावनू 155 धावा केल्या. दिल्लीसाठी कॅप्टन अक्षर पटेल याचा अपवाद वगळता इतर 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र समीर रिझवी याचा अपवाद वगळता एकालाही दिल्लीसाठी मोठी खेळी करता आली नाही. आता दिल्लीचे गोलंदाज 155 रन्सचं अरुण जेटली स्टेडियममध्ये कशाप्रकारे बचाव करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.