कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे दोघे चेन्नईसाठी ओपनिंग करतात. मात्र दोघांना इतर संघांच्या तुलनेत विस्फोटक सुरुवात करता आलेली नाही. सीएसकेची या मोसमातील आतापर्यंतची सर्वात संथ सलामी जोडी ठरली आहे. (Photo Credit: PTI)
चेन्नई सुपर किंग्स टीमने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र हीच चेन्नई 19 व्या मोसमात संघर्ष करताना दिसतेय. चेन्नईने निर्णायक क्षणी कमबॅक करुन आपलं प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवलंय. मात्र चेन्नईला एका बाबतीत अद्याप झगडावं लागतंय. चेन्नईचा हा संघर्ष नक्की कशाबाबत आहे हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)
चेन्नईचा कर्णधार आणि ओपनर ऋतुराज या दोघांनाही संघाला झंझावाती सुरुवात करुन देता आलेली नाही. संजूने काही डावात वेगात धावा केल्या आहेत. मात्र ऋतुराजला 2 अर्धशतकांचा अपवाद वगळता काही खास करता आलं नाही. (Photo Credit: PTI)
उपलब्ध आकड्यांनुसार, चेन्नईच्या सलामी जोडीने 8.48 च्या रनरेटने धावा केल्या आहेत. हा स्पर्धेतील सर्वात कमी रनरेट आहे. तसेच सरासरी ही 22.9 इतकी आहे. तर केकेआरची सरासरी ही 21.77 इतकी आहे. (Photo Credit: PTI)