चंद्रनाथ रथ कोण होता? पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे निकटचे सहकारी आणि वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली आहे. या घटनेमुळे राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्रामच्या दोहरिया परिसरात घडली, जिथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी रात्री उशिरा त्यां स्काॅर्पिओला घेराव घालून गोळीबार केला.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसे आणि जिवंत गोळ्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, चंद्रनाथ रथ ही तीच व्यक्ती आहे जी अलीकडील निवडणुकीत विविध ठिकाणी शूभेंदू अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करताना दिसली होती. जेव्हा ममता बॅनर्जी भवानीपूर येथील स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झाल्या, तेव्हा चंद्रनाथ रथ भाजप समर्थकांसह तिथे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, 30 एप्रिल रोजी, बंगाल निवडणुकीतील मतमोजणीच्या अवघ्या तीन दिवस आधी, जेव्हा ममता बॅनर्जी भवानीपूर येथील शकावत मेमोरियल हायस्कूलच्या स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झाल्या, तेव्हा चंद्रनाथ रथ भाजप समर्थकांसह तेथे पोहोचले. त्याच रात्री पूर्व मिदनापूरमधील आपल्या मूळ गावी कांथी येथे निघून गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या अनुपस्थितीत, त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आंदोलनाचे नेतृत्व केले.
चंद्रनाथ रथ (वय 42) हे पश्चिम बंगालमधील भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू राजकीय सहकारी होते. ते मूळचे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूर येथील रहिवासी होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात (Indian Air Force) जवळपास दोन दशके (20 वर्षे) सेवा बजावली. हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रातही काम केले होते. त्यांनी राहडा रामकृष्ण मिशनमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्यावर रामकृष्ण मिशनच्या विचारसरणीचा खोल प्रभाव होता आणि एका टप्प्यावर त्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारण्याचाही विचार केला होता.
रथ यांनी 2019 च्या सुमारास अधिकृतपणे शुभेंदू अधिकारी यांच्या टीममध्ये प्रवेश केला, जेव्हा अधिकारी तृणमूल काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. 2020 मध्ये जेव्हा अधिकारी भाजपमध्ये सामील झाले, तेव्हा रथ यांचे कुटुंबही (त्यांच्या आई हसी रथ यांच्यासह) भाजपमध्ये आले. ते अधिकारी यांच्या राजकीय कामकाजात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावत असत. संघटनात्मक कामे, मोहिमेचे व्यवस्थापन (उदा. भवानीपूर पोटनिवडणूक) आणि पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे ही त्यांची मुख्य कामे होती. त्यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या वातावरणात तणाव वाढला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा