हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. आयपीएल 2026 मध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. रोहित शर्माने त्याच्या नजरेसमोर मुंबई इंडियन्सचा गौरव उद्धवस्त होताना पाहिला असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी म्हणाला. पुढच्या सीजनसाठी पुन्हा रोहितकडे कॅप्टन्सी द्या अशी इच्छा तिवारीने बोलून दाखवली.
“मला 200 टक्के खात्री आहे, पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडे नवीन कॅप्टन असेल. सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाज आहे. त्याला इजा होऊ शकते हे ध्यानात घेऊन ते सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवू शकतात” असं मनोज तिवारी म्हणाला.