अवघ्या एका सामन्याच्या निकालानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) विजेता कोण असणार? हे स्पष्ट होणार आहे. या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे. तर गुजरातकडे एकूण दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. त्यामुळे कोणता संघ विजेता ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने अहमदाबादमधील हवामान कसं असणार? तसेच राखीव दिवशीही सामना न झाल्यास कोणता संघ विजेता ठरणार? हे जाणून घेऊयात. सामन्यात पावसाने विघ्न घातल्यास 3 नियमांच्या आधारे विजेता निश्चित केला जातो. या 3 नियमांबाबत जाणून घेऊयात.
साधारणपणे सामन्यात पावसाने जास्त वेळ व्यत्यय आणल्यास परिस्थितीनुसार ओव्हर कमी केले जातात. त्यानुसार ठराविक षटकांचा खेळ होतो. त्यानुसार विजेता निश्चित होता. मात्र पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 5-5 ओव्हरचा खेळ होणं गरजेचं असतं.
सामन्याचा निकाल लागावा यासाठी राखीव दिवसाची तरतूद आहे. मुख्य दिवशी सामना झाला नाही तरच राखीव दिवशी सामना होतो. राखीव दिवशी दोन्ही संघांना प्रत्येकी 120-120 षटकांचा वेळ असतो. आयपीएल स्पर्धेत 2023 साली अंतिम फेरीतील मुख्य दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर राखीव दिवशी सामना खेळवण्यात आला होता.
राखीव दिवशी सामना न झाल्यास कोणत्या आधारे विजेता निश्चित केला जातो? असा क्रिकेट चाहत्यांचा प्रश्न आहे. याबाबत जाणून घेऊयात. राखीव दिवसही रद्द झाल्यास 2 फायनलिस्ट टीमपैकी साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जातं. या नियमानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पुन्हा एकदा आयपीएल विजेता ठरेल.
क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक माहिती अशी की अहमदाबादमध्ये सामन्याच्या मुख्य दिवशी पावसाची अजिबात शक्यता नाही. एक्युवेदरनुसार, पावसाची शक्यता नाही. तसेच हवामान स्वच्छ असणार आहे. त्यामुळे मुख्य दिवशीच विजेता निश्चित होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.