Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..
Tv9 Marathi June 07, 2026 08:45 PM

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई ही झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील तरुण असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनात पार्टीची स्थापना केली. या पक्षाची अद्याप अधिकृत कुठेही नोंद नाही. परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  अवघ्या काही दिवसांमध्ये या पार्टीच्या फॉलोवर्सची संख्या कोटींच्या घरात पोहोचली. दरम्यान आतापर्यंत या पार्टीचं सर्व काम हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होतं. परंतु शनिवारी मात्र थेट कॉक्रोरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यात आलं.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेमध्ये होते. ते अमेरिकेमधून शनिवारी थेट दिल्ली विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आंदोलकांनी जतंर मंतरवर आंदोलनाची परवानगी मागितली. पोलिसांकडून देखील आंदोलनाची परवानगी देण्यात आली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारतीय तरुणाईचे विविध प्रश्न हाती घेऊन दिल्लीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे त्यांच्या छत्रपती  संभाजीनगरमधील घरी पोहोचले आहेत. दरम्यान त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता मी पुन्हा कधीही अमेरिकेला जाणार नाही, भारतामध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आमचा पक्ष कधीही कोणत्या राजकीय पक्षाशी जोडला जाणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंदोलानंतर त्यांनी आपला पुढचा प्लान देखील सांगितला आहे, आता संपूर्ण देश फिरण्याच्या प्लॅनवर विचार करत आहोत, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.  दरम्यान पालकांनो आपल्या मुलांना अडवू नका, त्यांना सिस्टमविरोधात आवाज उठवू द्या, असं आवाहान देखील त्यांनी यावेळी केलं आहे.  ज्यांना युवकांची काळजी आहे, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, असंही यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे. .

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.