घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. आपल्या घरातील काही विशिष्ट वस्तू थेट आपली आर्थिक स्थिती आणि सुदैवाशी जोडलेल्या असतात.
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरात अशा काही वस्तू असतात ज्या कधीही बाहेरील व्यक्तीच्या किंवा इतरांच्या नजरेत पडू नयेत, असे सांगितले जाते. या अशा वस्तू नेमक्या कोणत्या, याबद्दल आपण जाणून घेऊया.
घरातील तिजोरी किंवा कपाट जिथे आपण पैसे आणि दागिने ठेवतो, ती जागा अत्यंत खाजगी असली पाहिजे. असे मानले जाते की, तिजोरीवर वारंवार बाहेरील लोकांची नजर पडल्यास घरात अनावश्यक खर्च वाढतात आणि आर्थिक चणचण भासते. तिजोरी नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावी, कारण ही कुबेर देवाची दिशा मानली जाते. तसेच, तिजोरीचा दरवाजा नैऋत्य दिशेला उघडणारा असणे अत्यंत शुभ मानले जाते.
अनेकदा घरात पूजा किंवा धार्मिक विधी झाल्यानंतर जपमाळ, यंत्र, धार्मिक पुस्तके किंवा नारळ पूजेच्या ठिकाणी किंवा हॉलमध्ये उघड्यावर पडून राहतात. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे अशुभ मानले जाते. धार्मिक वस्तूंची पवित्रता आणि त्यामधील आध्यात्मिक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या वस्तू नेहमी एकांत किंवा सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित ठेवाव्यात.
घराची उत्तर दिशा ही धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची दिशा मानली जाते. या दिशेला माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ आणि सकारात्मक उर्जेने भरपूर असावी. या दिशेचे शुभ फळ मिळवण्यासाठी उत्तर दिशेला श्रीयंत्राची स्थापना करावी. तसेच या ठिकाणी तुळस, मनी प्लांट किंवा बांबूचे (Bamboo) रोप लावल्यास घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वेगाने वाढतो.